शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा नागरिकांशी ‘व्हिडिओ’ संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

कोराना संसर्गाचा धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौकशीकरीता आलेल्यांसाठी ही व्हिडीओ कॉलची सुविधा सुरू झाली आहे. कोरोना टाळेबंदीनंतर शासनाकडून प्रवासासाठी ई-पास सुविधा सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून त्याबाबत मदतीसाठी दूरध्वनी क्र मांकही देण्यात आले.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा धोका : जिल्हाधिकारी कार्यालयात फिजिकल डिस्टन्स्ािंगचा अनोखा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याची बाधा सरकारी यंत्रणेला होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हिडिओ कॉलद्वारे संवादाचा प्रयोग सुरू केला आहे. प्रशासन आणि नागरिकांमध्ये शारीरिक अंतर कायम ठेवताना संवादात मात्र अंतर पडू नये यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.कोराना संसर्गाचा धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौकशीकरीता आलेल्यांसाठी ही व्हिडीओ कॉलची सुविधा सुरू झाली आहे. कोरोना टाळेबंदीनंतर शासनाकडून प्रवासासाठी ई-पास सुविधा सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून त्याबाबत मदतीसाठी दूरध्वनी क्र मांकही देण्यात आले. तरीही नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष येवून चौकशी करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय आखण्यात आला.सध्या कोरोनालढ्यात मोठया प्रमाणात शासकीय यंत्रणा प्रत्यक्ष काम करत आहे. या संसर्गापासून यंत्रणेला दूर ठेवून नागरिकांना आवश्यक सेवा अखंड स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. आपण जेवढे शारीरिक अंतर पाळू, तेवढया प्रमाणात आपण या कोरोना संसर्गाला रोखण्यात यशस्वी होवू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हयात कोरोना संसर्ग बाधितांची संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग कार्यरत आहे. कोरोनाशी लढा देताना प्रत्यक्ष कार्य करणारे प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संबंध येतो. त्यामुळे अशा शासकीय कार्यालयात संसर्गाला रोखण्यासाठी या पद्धतीचे उपक्र म महत्वाचे ठरतील, असे मत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी व्यक्त केले.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ही आवश्यक उपाययोजना सुरू केली. प्रशासनाकडे दूरध्वनीवर किंवा ईमेलवर संपर्क साधून नागरिकांनी जास्तीत जास्त सामाजिक अंतर राखावे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक कार्यालयात अशाप्रकारे आवश्यक काळजी घेणे आता गरजेचे आहे.- दीपक सिंगला,जिल्हाधिकारीत्रिस्तरीय व्हिडिओ कॉलिंगची व्यवस्थाजर एखादा व्यक्ती ई-पासबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीकरीता आला तर त्याला खालच्या मुख्य दारातच ई-पासबाबत प्रत्यक्ष ऑनलाईन तपशील पाहून माहिती सांगितली जाते. जर त्याचे समाधान झाले नाही तर आपत्ती व्यवस्थापन विभागात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना पहिला व्हिडिओ कॉल केला जातो. याही ठिकाणी समाधान न झाल्यास निवासी उपजिल्हाधिकारी मार्गदर्शन करतात. त्यानंतर स्वत: जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार तिसऱ्या टप्प्यात नागरिकांशी संवाद साधतात.या सुविधेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, किशोर मडावी, संजय बारसिंगे, विक्की कन्नाके हे काम पाहात आहेत. कोरोना ई-पास, प्रवासाची परवानगी किंवा वाहतूक याबाबत कोणीही प्रत्यक्ष न येता दूरध्वनी किंवा ईमेल वर प्रथम चौकशी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या