शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST

चामोर्शी शहरात कोरोनाचे रुग्ण दररोज निघत असून, काही रुग्ण दगावले आहे. शहरातील दमट ओलसर वातावरण कोरोनाचे विषाणू अधिक काळ ...

चामोर्शी शहरात कोरोनाचे रुग्ण दररोज निघत असून, काही रुग्ण दगावले आहे. शहरातील दमट ओलसर वातावरण कोरोनाचे विषाणू अधिक काळ टिकून राहतात, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले जात आहे. त्यानुसार चामोर्शी शहरात कोंदट, दमट व ओलसर वातावरण दिसून येते. परंतु शहरातील नागरिकांचे आरोग्य कायम राखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करून सामाजिक जाणिवेच्या दृष्टीने प्रशासन काहीच करीत नाही अशी भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन करून निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे. येथील नाल्यांची साफसफाई वेळेवर होत नसल्याने घाणीमुळे नाल्या तुंबून राहतात. रस्त्यावरील कचरा कधीतरी झाडाला जातो. शहरातील सर्व गल्लीबोळात ओलसर जागेसह दमट वातावरण पाहावयास मिळतो. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता करणे गरजेचे आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथील उपविभागीय कार्यालय येथे कोरोनाबाबतची आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयासह शहरात निर्जंतुकीकरण करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. तरीपण प्रशासनाकडून कोणत्याही वाॅर्डात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आलेली नाही. फक्त काही मोजक्याच शासकीय कार्यालयामध्ये नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांकडून फवारणी पंपाद्वारे जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे व शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन शहरात वाढता कोरोना कहर जाणून निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणी चामोर्शी शहरवासीयांनी केली आहे.

याबाबत नगरपंचायतचे अभियंता निखिल कारेकर यांना विचारणा केली असता, फवारणीकरिता जंतुनाशक बोलाविण्यात आले असून, येत्या दाेन ते तीन दिवसात चामोर्शी शहरात निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

===Photopath===

230421\23gad_1_23042021_30.jpg

===Caption===

चामाेर्शी शहरातील नाल्या अशाप्रकारे गाळाने तुंबल्या आहेत.