शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

रोहयो विहिरींवर प्रशासनाची टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात मंजूर झालेल्या तसेच कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या विहिरींचे बांधकाम गडचिरोली पंचायत समितीच्या दिरंगाई व दुर्लक्षामुळे रखडले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यानंतर सिंचन विहिरींचे बांधकाम सुरू करण्याची शेतकऱ्यांची आशा मावळली आहे.गडचिरोली तालुक्यात २०१६-१७ मध्ये मंजूर झालेल्या ...

ठळक मुद्देमंजूर विहिरींचे बांधकाम रखडले : पंचायत समिती प्रशासनाची अक्षम्य दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात मंजूर झालेल्या तसेच कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या विहिरींचे बांधकाम गडचिरोली पंचायत समितीच्या दिरंगाई व दुर्लक्षामुळे रखडले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यानंतर सिंचन विहिरींचे बांधकाम सुरू करण्याची शेतकऱ्यांची आशा मावळली आहे.गडचिरोली तालुक्यात २०१६-१७ मध्ये मंजूर झालेल्या अनेक विहिरींचे बांधकाम फेब्रुवारी २०१७ मध्ये पं.स. व जि.प. निवडणुकीच्या काळात मंजुरीअभावी रखडले. त्यानंतर स्थानिक पं.स. मार्फत काही विहिरींना प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु पंचायत समितीच्या धोरणामुळे कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. पंचायत समितीतील काही अधिकाºयांच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांच्या रोहयो सिंचन विहिरी रखडल्या. २०१७ मध्ये ज्या रोहयो विहिरींना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली, असे शेतकरी जानेवारी २०१८ मध्ये विहीर बांधकाम करण्यास सज्ज झाले होते. परंतु पंचायत समिती प्रशासनाकडून अशा शेतकऱ्यांना विहिरीची मंजुरी मिळूनही व कार्यारंभ आदेश प्राप्त होऊनही रोहयो विहीर खोदण्यास मनाई करण्यात आली. दीड ते दोन वर्ष रोहयो विहिरीची फाईल पंचायत समितीच्या टेबलावरून घिरट्या मारूनही पं.स. प्रशासनाकडून रोहयो विहीर बांधकामावर टाच लावण्यात आली. परंतु या प्रकाराकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाºयांमार्फत गाव पातळीवरील रोजगार सेवकांना रोहयो विहिरींचे बांधकाम सुरू करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे रोजगार सेवकही हतबल झाले आहेत. केंद्र शासनाकडून रोजगार हमी योजनेचा निधी ठप्प झाला असल्याने मंजूर विहिरींचे काम होणार नाही, असे लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सांगितले जात असून त्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे विहिरींच्या बांधकामाबाबत शंका निर्माण होत आहेत. ग्रामपंचायतीच्या ठरावापासून पंचायत समितीच्या रोहयो विभागात दोन ते तीन वर्ष विहीर मंजुरीसाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कृषी क्षेत्राकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळाशासनाच्या वतीने शेतकºयांना सिंचन सुविधेचा लाभ देण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र या योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच उदासीन असल्याने गडचिरोली जिल्ह्यात नरेगाच्या सिंचन विहीर योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, नवनियुक्त जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आढावा घेऊन वस्तूस्थिती जाणून घ्यावी. लाभार्थी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.