शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार

By admin | Updated: October 7, 2016 01:34 IST

धानोरा तालुक्यातील येरमागड शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी राजमू बुधकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला

पालकांचा आरोप : येरमागड येथील विद्यार्थी मृत्यूप्रकरणगडचिरोली : धानोरा तालुक्यातील येरमागड शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी राजमू बुधकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस आदिवासी विकास विभागाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आश्रमशाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यापासून आश्रमशाळेतील संपूर्ण २१३ विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे, अशीही माहिती दिली.केंद्र शासनाकडून आदिवासी विकास विभागाला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होतो. तरीही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन ते तीन कार्यालयाचा पदभार दिला आहे. त्यामुळे ते आदिवासी विकास विभागाकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही. प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना अडचणी निर्माण होतात. पर्यवेक्षिय यंत्रणासुद्धा व्यवस्थित काम करीत नाही. राजमू धुर्वे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस सहायक प्रकल्प अधिकारी व निरीक्षक जबाबदार आहेत. शाळा तपासणीच्या वेळी आश्रमशाळेत असलेल्या कमरता ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत नाही. त्यामुळे निरीक्षक व सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आश्रमशाळेमध्ये आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्यपाल यांना निवेदन पाठविले जाणार आहे, अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष सुधाकर तुलावी, संदीप वरखडे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला सुनील कुमरे, भगवान मडावी, लिंगा वेलादी, सुखदेव नैताम, रामदास कुळमेथे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)