शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शासनच झोपेत असल्याने प्रशासनही झोपले- धर्मरावबाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:05 IST

जिल्ह्यात आज कोणती विकास कामे सुरू आहेत किंवा नाहीत याच्याशी जिल्ह्याच्या सत्ताधारी नेत्यांना काहीही देणेघेणे नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आज कोणती विकास कामे सुरू आहेत किंवा नाहीत याच्याशी जिल्ह्याच्या सत्ताधारी नेत्यांना काहीही देणेघेणे नाही. शासनच झोपेत आहे, त्यामुळे प्रशासनही झोपले आहे. आमच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामेही या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकलेली नाहीत, अशी खंत माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत व्यक्त केली.गेल्या सरकारच्या कार्यकाळात आर.आर. पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात अनेक कामे मंजूर होऊन झपाट्याने मार्गी लागली. ज्या प्रमाणात त्यावेळी जिल्ह्याला निधी मिळत होता तेवढा निधी गेल्या तीन वर्षात कधीही मिळाला नाही. नागरिकांनीच आता तो काळ आणि आताचा काळ याची तुलना करावी, असे आवाहन धर्मरावबाबांनी केले.सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणात असलेल्या लोहखनिज उत्खननातून आदिवासी नागरिकांचे उत्थान व्हावे यासाठी मी खनिकर्म खात्याचा मंत्री असताना या प्रकल्पाचा मंजुरी दिली होती. त्यामुळे या प्रकल्पाला माझा विरोध नाही. पण त्यातून आदिवासींना रोजगार निर्मिती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आदिवासी लोकांनी केवळ दगड फोडण्याचेच काम करावे का? त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे, पोकलँडने उत्खनन करण्याऐवजी आदिवासी लोकांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न व्हावेत. आदिवासींना ट्रक खरेदीसाठी कर्ज देऊन लोहखजिन उत्खननासाठी त्या ट्रक्सचा वापर करून त्याच्या मोबदल्यातून कर्ज फेडण्याची सोय करावी असा सल्लाही यावेळी धर्मरावबाबांनी दिला. पण हे सर्व करण्याची तळमळ ना प्रशासनात आहे, ना सरकारमध्ये. त्यामुळे पुढील निवडणुकीत नागरिकांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रपरिषदेला जि.प.सभापती भाग्यश्री आत्रामही उपस्थित होत्या.पवारांच्या विदर्भ दौºयाची सुरूवात गडचिरोलीतूनराष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विदर्भात ठिकठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. या दौºयाची सुरूवात गडचिरोलीपासून होत आहे. अनेक वर्षानंतर ते गडचिरोली जिल्ह्यात येणार असल्यामुळे राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर नागरिकांनाही त्यांच्या आगमनाची उत्सुकता असल्याचे यावेळी आत्राम यांनी सांगितले. पवार यांची जाहीर सभा बुधवार दि.१५ ला दुपारी १ वाजता अभिनव लॉन येथे होणार आहे.