शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

माध्यमिक शाळांतील समायोजन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:11 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनावरून १० माध्यमिक शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांपैकी काही शाळेत कार्यभार नसताना मागील दोन वर्षांपासून अतिरिक्त शिक्षक असून त्यांच्या वेतनावर शासनाच्या पैशावर अपव्यय होत आहे. तर काही शाळांवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जि. प. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभाग उदासीन : समायोजन प्रक्रिया मार्गी लावण्याची शिक्षक भारती संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनावरून १० माध्यमिक शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांपैकी काही शाळेत कार्यभार नसताना मागील दोन वर्षांपासून अतिरिक्त शिक्षक असून त्यांच्या वेतनावर शासनाच्या पैशावर अपव्यय होत आहे. तर काही शाळांवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जि. प. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.राज्य शासनाने पवित्र प्रणालीमार्फत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे धोरण अवलंबले आहे. या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत एकही शिक्षक अतिरिक्त राहणार नाही, अशा सूचनासुद्धा दिल्या होत्या. परंतु जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) याविषयी गंभीर दिसत नाही. खासगी माध्यमिक /प्राथमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांना जि. प. शाळेत समायोजित करण्याची प्रक्रिया नोव्हेंबर २०१८ मध्ये पार पाडण्यात आली. परंतु जि. प. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे समायोजन करण्यात आले नाही. परिणामी गुणवत्तेवर परिणाम होत आहे.जिल्ह्यात जि. प. च्या माध्यमिक विभागाचे शिक्षक अतिरिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीत. ही स्थिती आहे. याबाबत शिक्षण विभागाला माहिती असतानाही त्यांचे समायोजन का करण्यात येत नाही, असा सवाल करीत तत्काळ समायोजन प्रक्रिया राबवून पुढील सत्रात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, तसेच कार्यभार नसताना अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनावर होणाऱ्या शासनाच्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत न्याय मागण्यात येईल, असे शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे.वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्षसमायोजन प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, याकरिता शिक्षक भारती संघटनेने १६ एप्रिल, १५ जून, १७ नोव्हेंबर २०१८ व ६ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी २०१९ ला निवेदन देऊन मागणी केली होती. त्यानुसार प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे सांगण्यात आले. परंतु अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दुर्गम भागात जावे लागेल. याची भीती वाटल्याने त्यांनी समायोजन प्रक्रिया होऊ नये म्हणून राजकीय बळाचा वापर केला व प्रक्रिया पुढे ढकलली, अशी चर्चा आहे, असा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे. माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रखडण्याची चिन्हे या प्रकरणावरून दिसून येत आहे, असा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे.