शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

माध्यमिक शाळांतील समायोजन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:11 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनावरून १० माध्यमिक शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांपैकी काही शाळेत कार्यभार नसताना मागील दोन वर्षांपासून अतिरिक्त शिक्षक असून त्यांच्या वेतनावर शासनाच्या पैशावर अपव्यय होत आहे. तर काही शाळांवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जि. प. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभाग उदासीन : समायोजन प्रक्रिया मार्गी लावण्याची शिक्षक भारती संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनावरून १० माध्यमिक शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांपैकी काही शाळेत कार्यभार नसताना मागील दोन वर्षांपासून अतिरिक्त शिक्षक असून त्यांच्या वेतनावर शासनाच्या पैशावर अपव्यय होत आहे. तर काही शाळांवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जि. प. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.राज्य शासनाने पवित्र प्रणालीमार्फत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे धोरण अवलंबले आहे. या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत एकही शिक्षक अतिरिक्त राहणार नाही, अशा सूचनासुद्धा दिल्या होत्या. परंतु जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) याविषयी गंभीर दिसत नाही. खासगी माध्यमिक /प्राथमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांना जि. प. शाळेत समायोजित करण्याची प्रक्रिया नोव्हेंबर २०१८ मध्ये पार पाडण्यात आली. परंतु जि. प. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे समायोजन करण्यात आले नाही. परिणामी गुणवत्तेवर परिणाम होत आहे.जिल्ह्यात जि. प. च्या माध्यमिक विभागाचे शिक्षक अतिरिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीत. ही स्थिती आहे. याबाबत शिक्षण विभागाला माहिती असतानाही त्यांचे समायोजन का करण्यात येत नाही, असा सवाल करीत तत्काळ समायोजन प्रक्रिया राबवून पुढील सत्रात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, तसेच कार्यभार नसताना अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनावर होणाऱ्या शासनाच्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत न्याय मागण्यात येईल, असे शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे.वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्षसमायोजन प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, याकरिता शिक्षक भारती संघटनेने १६ एप्रिल, १५ जून, १७ नोव्हेंबर २०१८ व ६ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी २०१९ ला निवेदन देऊन मागणी केली होती. त्यानुसार प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे सांगण्यात आले. परंतु अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दुर्गम भागात जावे लागेल. याची भीती वाटल्याने त्यांनी समायोजन प्रक्रिया होऊ नये म्हणून राजकीय बळाचा वापर केला व प्रक्रिया पुढे ढकलली, अशी चर्चा आहे, असा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे. माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रखडण्याची चिन्हे या प्रकरणावरून दिसून येत आहे, असा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे.