शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

लगाम आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: September 24, 2016 03:05 IST

पाणी पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यातील लगाम-बोरी येथील पाणी पुरवठा बंद असून

रूग्णवाहिकेतून आणतात पाणी : लगामबोरीची पाणी पुरवठा योजना १५ दिवसांपासून बंदमुलचेरा : पाणी पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यातील लगाम-बोरी येथील पाणी पुरवठा बंद असून याचा फटका प्राथमिक आरोग्य केंद्रालाही बसला आहे. कर्मचाऱ्यांना व रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकमेव हातपंप असून तो सुध्दा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मागील दोन वर्षांपासून बंद आहे. हातपंप पाडून सबमर्शीबल पंप बसविण्यात आला. मात्र हातपंपात आतमध्ये जुनी मोटार गेल्याने हातपंप सुरू करता आला नाही. लगामबोरीचा पाणी पुरवठा १५ दिवसांपासून बंद असल्याने रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. सध्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची गर्दी वाढलेली आहे. दोन किमी अंतरावरील शाळेतून आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेने पाणी आणावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)पाणी सोडण्याची वेळ बदलापाणी पुरवठा विभागातर्फे सकाळी ७.३० ते ८ वाजतादरम्यान पाणी सोडण्यात येते. मात्र सकाळी शालेय विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांना सकाळी ७ वाजता तयारी करावी लागते. नळ उशीरा सोडत असल्यामुळे विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी धावपळ होते. सध्याची वेळ बदलवून सकाळी ६.३० वाजता पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.महावितरण व पाणी पुरवठा विभागात दोषावरून कलगीतुरावीज वितरण कंपनीने लावलेल्या जनित्रामध्ये बिघाड असताना सुध्दा कंपनीचे कनिष्ट अभियंता मानायला तयार नव्हते. पाणी पुरवठा विभागाच्या संयंत्रामध्येच दोष आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मशीन चेक करणे सुरू आहे. विजेचा दाब कमी असल्यामुळे मोटारपंप बंद आहेत. कमी विजेच्या दाबामुळे मशीनमधील काही पार्ट जळाले असे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता जी. डी. बारापात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बिघाड नेमका कुठे आहे, हे शोधण्यात पाच दिवस गेले. ब्रह्मपुरीवरून मिस्त्री बोलविण्यात आले, असे ते म्हणाले. ईएलसी जळाले ते चंद्रपूरवरून आणण्यासाठी तीन दिवस लागेल. दुरूस्तीचे काम सुरू असताना पाणी पुरवठा विभागाचे एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिलेली नाही. कधी विजेचा कमी दाब तर खंडीत वीज पुरवठा तर कधी पाईपलाईन फुटणे याबाबीमुळे लगामबोरी येथील पाणी पुरवठा दीड महिन्यांपासून अधूनमधून बंद राहत आहे. गेली १५ दिवस पाणी पुरवठा ठप्प असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोष निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा विभागाचा कुणीही वाली राहिला नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा विभागाने तत्काळ बिघाड दुरूस्त न केल्यास पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.