शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

३६ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

By admin | Updated: November 8, 2014 01:16 IST

२०११ मध्ये राज्यभरासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेदरम्यान कमी विद्यार्थी संख्या...

गडचिरोली : २०११ मध्ये राज्यभरासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेदरम्यान कमी विद्यार्थी संख्या आढळून आलेल्या शाळातील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ५ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी ५० अतिरिक्त शिक्षकांपैकी ३६ शिक्षकांचे खासगी अनुदानित शाळेत आॅनलाईन समुपदेशनाने समायोजन केले आहे. जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांचे एचएससी डीएड्धारक ३० शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी १७ शिक्षकांचे समायोजन ५ व्या वर्गाला शिकविण्यासाठी दुसऱ्या खासगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आले आहे. १३ पैकी १३ ही अतिरिक्त शिक्षकांचे इयत्ता ७ वी ते ८ व्या वर्गावर समायोजन करण्यात आले आहे. ७ अतिरिक्त शिक्षकांपैकी ६ शिक्षकांचे समायोजन इयत्ता ९ वी ते १० वी वर्गावर जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेत आॅनलाईन समुपदेशनाने करण्यात आले आहे. तसेच काही शिक्षकांचे समायोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ३३ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन संस्थास्तरावर करण्यात आले असल्याची माहिती आहे. आता एसएससी डीएड्धारक १४ शिक्षकांचे समायोजन शिल्लक आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १० वी वर्गावर अनेक अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र शिल्लक असलेले १४ शिक्षकांकडे या वर्गांना अध्यापन करण्यासाठी पात्रता नसल्यामुळे या शिक्षकांचे समायोजन झाले नाही. उर्वरित १४ शिक्षकांचे समायोजन डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. संपूर्ण राज्यात गडचिरोली जिल्हा परिषदेचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत प्रथम क्रमांकावर असल्याचे समजते. गडचिरोलीशिवाय अनेक जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिल्लक आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करण्याबाबत १४ आॅक्टोबर २०१४ रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे, असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी दिले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला गती दिली. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात उपलब्ध जागेनुसार समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)