शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गडचिरोलीत आदिवासी व बहुजन महिलांच्या वेदनांना फोडली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:33 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय.

ठळक मुद्देमहिला व बालकांच्या सन्मानार्थ २३ आॅक्टोबर २०१६ ते १४ जानेवारी २०१७ दरम्यान काढण्यात आलेल्या ८४ दिवसांच्या यात्रेत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सदर यात्रा राजस्थानच्या दुर्गापूर येथून छत्तीसगड, ओडिशा व इतर राज्यात पोहोचली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय. काव्य संग्रहातून त्यांनी महिलांच्या विविध प्रकारच्या वेदना प्रतिबिंबीत केल्या. महिला साहित्यिकांमध्ये त्यांचे नाव विदर्भासह महाराराष्ट्रात आदराने घेतले जाते.‘रान आसवांचे तळे’, ‘रानपाखरांची माय’ या दोन काव्यसंग्रहातून त्यांनी आदिवासी महिलांच्या जीवनाचे वास्तव मांडले. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे लेखनकार्य अविरत सुरू आहे. शिवाय विविध वर्तमानपत्रात त्यांचे वैचारिक, प्रासंगिक व समिक्षणात्मक लेख प्रकाशित झाले आहे. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील कवयित्री म्हणून उदयास आलेल्या कुसूम अलाम यांच्या चार कविता मुंबई विद्यापीठाच्या मराठी एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग-१ च्या अभ्यासक्रमात तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या बीएसडब्ल्यू भाग-१ च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कवयित्री अलाम यांच्या साहित्यातून आदिवासी महिला बहूजन, शेतकरी व श्रमीक वर्गातील महिलांच्या समस्या अधोरेखित झाल्या आहेत.कुसूम अलाम यांना साहित्यासह समाजकारणात आवड आहे. विविध सामाजिक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी लेखन कार्यासह चर्चासत्र, व्याख्यान व इतर माध्यमातून योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे सन २०१४ मध्ये तत्कालीन राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते पुणे येथे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय विदर्भ साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलनात त्यांचा सन्मान करण्यात आला. २००८ मध्ये सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. पुणे येथे आदिवासी संस्कृती व मातृसत्ताक पद्धतीवर त्यांनी २०१६ मध्ये व्याख्यान दिले आहे.आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्राय महासचिव अशोक चौधरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या यात्रेत १० राज्याच्या आदिवासीबहुल भागात महिला व बाल अत्याचार तसेच शोषणाविरूद्ध जनजागृतीचे कार्य अलाम यांनी केले. कुसूम अलाम यांनी २००७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूकही लढविली. यात त्या मौशीखांब-मुरमाडी या जि.प. क्षेत्रातून सदस्य म्हणून निवडून आल्या. २००७ ते २०१२ दरम्यान जि.प.च्या माध्यमातून विविध समस्यांना वाचा फोडली.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस