शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आदिवासींनो, शिक्षणाकडे वळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:17 IST

शिक्षणातून माणसाला शहाणपण व संस्कार मिळतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांनी शिक्षणाची कास धरून आपल्या पाल्यांना शिक्षणाकडे वळवावे.

ठळक मुद्देधर्मरावबाबांचे आवाहन : सिरोंचात सामाजिक प्रबोधन मेळावा

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : शिक्षणातून माणसाला शहाणपण व संस्कार मिळतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांनी शिक्षणाची कास धरून आपल्या पाल्यांना शिक्षणाकडे वळवावे. शिक्षणातूनच आदिवासी नागरिकांचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना व सामाजिक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन येथील आसरअल्ली मार्गावरील गोटूलभूमीत करण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, सिरोंचा पं.स.चे उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती आदी उपस्थित होते.याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आसरअल्ली मार्गावरील गोटूलभूमीत वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांनी संघटनेच्या नावावर काही लोक आदिवासी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी भाग्यश्री आत्राम व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.