शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

दोघांची भर, मात्र कोरोबाधितांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:01 IST

दरम्यान गुरूवारी धानोरा येथे प्रथमच दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. परंतू ५ लोकांना सुटी झाल्यामुळे आता २३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाच जणांना सुटी दिल्यानंतर त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारातच प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : पाच पॉझिटिव्ह रुग्ण उपचारानंतर परतले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून कोरोनामुळे दहशतीत असलेल्या जिल्हावासियांना गुरूवारी (दि.२८) काहीसा दिलासा मिळाला. सर्वप्रथम कोरोनाबाधित म्हणून दाखल झालेल्या कुरखेडा व चामोर्शी येथील पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाच्या आजारावर मात केल्यानंतर सुखरूपपणे त्यांना त्यांच्या गावी रवाना करताना अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करून चांगल्या आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान गुरूवारी धानोरा येथे प्रथमच दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. परंतू ५ लोकांना सुटी झाल्यामुळे आता २३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाच जणांना सुटी दिल्यानंतर त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारातच प्रदान करण्यात आले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे व इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आजारातून बाहेर आलेल्या रूग्णांपैकी कुरखेडा येथील चार तर चामोर्शी येथील एका रु ग्णाचा समावेश होता. हे पाचही रु ग्ण त्यांच्या घरी रु ग्णवाहिकेने रवाना झाले. खबरदारी म्हणून त्यांना पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. सात दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत.गेल्या १८ मे रोजी जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर सतत ही संख्या वाढत जाऊन २८ वर पोहोचली. आतापर्यंत बाधित रुग्णांमध्ये बहुतांश लोक तरुण वयाचे आहेत. त्यामुळे ते कोरोनावर मात करतील असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.जिल्ह्यात बाहेरून आलेल्या आपल्याच लोकांना कोरोना संसर्ग झालेला आहे आणि त्यातील रूग्ण बरे होण्यास सुरूवातही झाली आहे. नागरिकांनी न घाबरता बरे होवून गेलेल्या रूग्णांना स्विकारले पाहिजे. आता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे संसर्गाचा धोका राहिलेला नाही. जिल्ह्यातील उर्वरीत २३ रूग्णही लवकरच अशा प्रकारे बरे होवून आपापल्या घरी जातील, हा विश्वास आम्हाला आहे. - दीपक सिंगला, जिल्हाधिकारीरु ग्णालयातून सोडण्यात आलेल्या सर्व रूग्णांना सॅनिटेशन किट व गृह विलगीकरणाच्या किट सोबत देण्यात आल्या आहते. त्यांना आता घरी खबरदारी म्हणून सात दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यांची उपचारादरम्यान रु ग्णालयातील सर्व डॉक्टर इतर कर्मचाºयांनी चांगली काळजी घेतली. सर्व नागरिकांनी आता कोरोना रूग्णांशी नाही तर कोरोना आजाराशी लढाईच आहे. आपला जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करूया.- डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सकसर्वच रुग्णांचा उपचारांना प्रतिसादआता रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व २३ रु ग्ण दवाखान्यात उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्या जीवितास सध्यातरी कोणताही धोका नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित काही रुग्ण मृत्यूच्या दाढेत पोहोचले असले तरी गडचिरोली जिल्ह्यात तशी वेळ कोणावर येणार नाही याची काळजी आरोग्य विभाग घेत आहे. यात वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या