शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बौद्धधम्माच्या दीक्षेबरोबरच प्रत्यक्ष आचरणही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:35 IST

देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या.

ठळक मुद्देभीमराव आंबेडकर यांचे आवाहन : गडचिरोली येथे बौद्धधम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या. समाजात बौद्धधम्म रूजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली येथे बौद्धधम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, जयसेन गवई, अ‍ॅड. एस. एस. वानखेडे, यू. जी. बोराडे, अनिल मेश्राम, भिकाजी कांबळे, देवेंद्र मेश्राम, वामन सरदार, रवी भगत, सेवचंद्र नागदेवते, देवराव मेश्राम, जनार्धन खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे मार्गदर्शन करताना भिमराव आंबेडकर म्हणाले, १२०० वर्षांपूर्वी भारतात बौद्धधम्माचा प्रचार झाला होता. अनेकांनी बौद्धधम्म स्वीकारला होता. मात्र प्रतिक्रांती होऊन काही वर्षातच बौद्धधम्म लुप्त पावला. बौद्धधम्माचे विचार आचरणात न आणल्याने ही बाब घडली आहे. इतिहासाने दिलेला हा धडा प्रत्येक बौद्ध अनुयानाने शिकला पाहिजे. बौद्धधम्म आचरणात आणून तो पुढील पिढीमध्ये रूजविणे आवश्यक आहे. बौद्धधम्माच्या प्रचारात अनेक राजकीय अडथळे आहेत. या अडथळ्यांची शर्यत पार करून बौद्धधम्माचा प्रचार करायचा आहे. यासाठी बौद्ध अनुयांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.कार्यक्रमादरम्यान धम्म दीक्षा सोहळा पार पाडला. ११ उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. गौतम डांगे, संचालन तुलाराम राऊत तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले.