शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बौद्धधम्माच्या दीक्षेबरोबरच प्रत्यक्ष आचरणही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:35 IST

देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या.

ठळक मुद्देभीमराव आंबेडकर यांचे आवाहन : गडचिरोली येथे बौद्धधम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या. समाजात बौद्धधम्म रूजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली येथे बौद्धधम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, जयसेन गवई, अ‍ॅड. एस. एस. वानखेडे, यू. जी. बोराडे, अनिल मेश्राम, भिकाजी कांबळे, देवेंद्र मेश्राम, वामन सरदार, रवी भगत, सेवचंद्र नागदेवते, देवराव मेश्राम, जनार्धन खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे मार्गदर्शन करताना भिमराव आंबेडकर म्हणाले, १२०० वर्षांपूर्वी भारतात बौद्धधम्माचा प्रचार झाला होता. अनेकांनी बौद्धधम्म स्वीकारला होता. मात्र प्रतिक्रांती होऊन काही वर्षातच बौद्धधम्म लुप्त पावला. बौद्धधम्माचे विचार आचरणात न आणल्याने ही बाब घडली आहे. इतिहासाने दिलेला हा धडा प्रत्येक बौद्ध अनुयानाने शिकला पाहिजे. बौद्धधम्म आचरणात आणून तो पुढील पिढीमध्ये रूजविणे आवश्यक आहे. बौद्धधम्माच्या प्रचारात अनेक राजकीय अडथळे आहेत. या अडथळ्यांची शर्यत पार करून बौद्धधम्माचा प्रचार करायचा आहे. यासाठी बौद्ध अनुयांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.कार्यक्रमादरम्यान धम्म दीक्षा सोहळा पार पाडला. ११ उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. गौतम डांगे, संचालन तुलाराम राऊत तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले.