शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

पावसाने मारली दडी रोवणीची कामे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:08 IST

१६ जुलै रोजी चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटूनही पाऊस झाला नाही. मधात दोनदा अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने कायमची दांडी मारली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा : ३० टक्के रोवणी अद्यापही शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी/गडचिरोली : १६ जुलै रोजी चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटूनही पाऊस झाला नाही. मधात दोनदा अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने कायमची दांडी मारली. परिणामी आता शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी जिल्हाभरातील ३० टक्के रोवणीचे काम शिल्लक असून सध्या अनेक ठिकाणच्या रोवणीचे काम थांबले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. ७० टक्के जनतेचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे वार्षिक अंदाजपत्रक शेती व्यवसायावर अवलंबून असते. १६ जुलैला झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानपीक रोवणीच्या कामास वेग आला. १० दिवस रोवणीचे काम चांगल्या पद्धतीने झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू लागली. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, सिंचन विहीर, कृषिपंप आदी साधने आहेत, अशा शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने आपल्या शेतजमिनीत रोवणीचे काम कसेबसे केले. आज किंवा उद्या पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती. मात्र गेल्या १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. जिल्ह्यातील काही सदन शेतकऱ्यांनी शेतीलगतच्या तलाव, बोड्यात मोटारपंप लावून शेतजमिनीला पाणी केले. दरम्यान आठवडाभर डिझेल इंजिन व मोटार पंपचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र आता पाणीस्त्रोतही कोरडे झाल्याने शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय उरला नाही.कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडा- लखमापूरवासीयांची हाकचामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी परिसरात धानपीक रोवणीचे काम ७० टक्के झाले आहे. ३० टक्के रोवणीचे काम होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस येण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे धानपीक रोवणीचे काम पूर्ण होण्यासाठी रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे लखमापूर परिसरात सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वीच्या पावसाने धान पऱ्हे वाढले. मात्र आता पऱ्ह्यांना पाणी नाही. त्यामुळे खोदलेल्या पेंढ्या वाळलेल्या स्थितीत दिसून येत आहेत. १० ते १५ आॅगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास केलेली रोवणी व पऱ्हे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही.रोगाचा प्रादुर्भाव बळावणारउष्णतेमुळे खरीप हंगामातील धानासह इतर पिकांवरही विविध प्रकारचे रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत नसून उष्णतामानही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Rainपाऊस