शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पावसाने मारली दडी रोवणीची कामे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:08 IST

१६ जुलै रोजी चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटूनही पाऊस झाला नाही. मधात दोनदा अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने कायमची दांडी मारली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा : ३० टक्के रोवणी अद्यापही शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी/गडचिरोली : १६ जुलै रोजी चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटूनही पाऊस झाला नाही. मधात दोनदा अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने कायमची दांडी मारली. परिणामी आता शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी जिल्हाभरातील ३० टक्के रोवणीचे काम शिल्लक असून सध्या अनेक ठिकाणच्या रोवणीचे काम थांबले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. ७० टक्के जनतेचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे वार्षिक अंदाजपत्रक शेती व्यवसायावर अवलंबून असते. १६ जुलैला झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानपीक रोवणीच्या कामास वेग आला. १० दिवस रोवणीचे काम चांगल्या पद्धतीने झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू लागली. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, सिंचन विहीर, कृषिपंप आदी साधने आहेत, अशा शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने आपल्या शेतजमिनीत रोवणीचे काम कसेबसे केले. आज किंवा उद्या पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती. मात्र गेल्या १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. जिल्ह्यातील काही सदन शेतकऱ्यांनी शेतीलगतच्या तलाव, बोड्यात मोटारपंप लावून शेतजमिनीला पाणी केले. दरम्यान आठवडाभर डिझेल इंजिन व मोटार पंपचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र आता पाणीस्त्रोतही कोरडे झाल्याने शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय उरला नाही.कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडा- लखमापूरवासीयांची हाकचामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी परिसरात धानपीक रोवणीचे काम ७० टक्के झाले आहे. ३० टक्के रोवणीचे काम होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस येण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे धानपीक रोवणीचे काम पूर्ण होण्यासाठी रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे लखमापूर परिसरात सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वीच्या पावसाने धान पऱ्हे वाढले. मात्र आता पऱ्ह्यांना पाणी नाही. त्यामुळे खोदलेल्या पेंढ्या वाळलेल्या स्थितीत दिसून येत आहेत. १० ते १५ आॅगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास केलेली रोवणी व पऱ्हे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही.रोगाचा प्रादुर्भाव बळावणारउष्णतेमुळे खरीप हंगामातील धानासह इतर पिकांवरही विविध प्रकारचे रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत नसून उष्णतामानही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Rainपाऊस