शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानासाठी कृती महत्त्वाची

By admin | Updated: January 30, 2016 01:59 IST

संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे.

आरमोरीत लोक माहिती अभियान : जनसामान्यांच्या मेळाव्यात चंदू मारकवार यांचे प्रतिपादनआरमोरी : संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे. शासन काय करते? असा सवाल करण्यापेक्षा मी स्वत: देशासाठी, माझ्या गावासाठी काय करतो, याचे आत्मपरिक्षण करावे, स्वच्छता अभियानाच्या यशासाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील राजगड गावचे उपसरपंच चंदूजी मारकवार यांनी शुक्रवारी केले. आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात लोक माहिती अभियानांतर्गत आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मारकवार बोलत होते. सरपंच, ग्रा. पं. सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व जनसामान्यांच्या मेळाव्याला कृषी अधिकारी अभिजीत धडे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक सुनील पाटील, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. आर. धनकर, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डी. के. बारापात्रे, नायब तहसीलदार डी. एस. नैताम, सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक संजय आर्वीकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश गांजरे यांनी केले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी दिली योजनांची माहितीव्याख्यान सत्रात अभिजीत धेडे यांनी मृदा आरोग्य पत्रिका, कृषी योजना, बी- बियाणे तयार करण्याची पद्धती, मातीचे परिक्षण याबाबत, सुनील पाटील यांनी पंतप्रधान जीवनज्योती योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आदींची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली. एस. आर. धनकर यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा, आदिवासींचे वनहक्क, भूहक्क, पेसा अंतर्गत ग्रामसभेचे महत्त्व, डी. के. बारापात्रे यांनी ग्रामीण जीवनज्योती योजना, इंदिरा आवास योजना, मागासक्षेत्र अनुदान योजना डी. एस. नैताम यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची माहिती दिली.