शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
2
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
3
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
4
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
5
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
6
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
7
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
8
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
9
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
10
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
11
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
12
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
13
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
14
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
15
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
16
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
17
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
18
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
19
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
20
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...

४० भूखंडधारकांवर कारवाई

By admin | Updated: March 13, 2015 00:05 IST

पाच वर्षांचा कालावधी उलटूनही एमआयडीसीतील भूखंडावर उद्योग स्थापन न करणाऱ्या भूखंडधारकारंवर एमआयडीसी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ....

गडचिरोली : पाच वर्षांचा कालावधी उलटूनही एमआयडीसीतील भूखंडावर उद्योग स्थापन न करणाऱ्या भूखंडधारकारंवर एमआयडीसी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत एका वर्षात सुमारे ४० भूखंड परत घेतले आहेत. गडचिरोली येथील एमआयडीसीमध्ये एकूण १४६ भूखंड आहेत. सदर भूखंड उद्योगनिर्मिती करू इच्छीणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध करून दिली जातात. सदर भूखंड केवळ १० रूपये चौरस मिटर दराने एमआयडीसी प्रशासन उपलब्ध करून देते. भूखंड मिळण्यासाठी एखाद्या उद्योजकाने एमआयडीसीकडे अर्ज केल्यानंतर एमआयडीसी प्रशासन संबंधित उद्योजकाची मुलाखत घेतात. या मुलाखतीमध्ये सदर उद्योजक खरच उद्योग स्थापन करणार काय, उद्योग स्थापन करण्यासाठी त्याची आर्थिक बाजू लक्षात घेऊन भूखंड मंजूर केल्या जाते. भूखंड मंजूर झाल्यानंतर बरेचसे उद्योजक उद्योगच स्थापन करीत नाही. त्यामुळे सदर भूखंड रिकामा पडून राहण्याची शक्यता राहते. एमआयडीसी प्रशासनाने अशा भूखंडधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण सुरू केले आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे १५ भूखंडधारकांवर कारवाई करीत त्यांच्याकडेचे भूखंड परत घेण्यात आले आहेत. तर एका वर्षाच्या कालावधीत सुमारे ४० भूखंडधारकांवर कारवाई करून ते परत घेण्यात आले आहेत. उद्योगाला आवश्यक असलेल्या जमीन, वीज, पाणी या सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध व्हावे, या उद्देशाने एमआयडीसी स्थापना झाली आहे. अत्यंत कमी दरात जमीन उपलब्ध होत असल्याने काही नागरिक भूखंड घेतात. मात्र या भूखंडांचा उपयोग बऱ्याचवेळा राहण्यासाठी केला जात असल्याचे आढळून आले आहे. अशा भूखंडावर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करीत असेही भूखंड परत घेतले आहेत. (नगर प्रतिनिधी)नागपूर येथून चालतो कारभारगडचिरोली एमआयडीसीसाठी असलेले स्वतंत्र कार्यालय बंद करण्यात आले आहे. भूखंड घेऊ इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेणे, भूखंडांचे वाटप करणे आदी सर्व प्रक्रिया नागपूर येथील एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयातून पूर्ण केल्या जातात. गडचिरोली एमआयडीसीसाठी एकही कर्मचारी नाही. केवळ सर्वेअर नेमण्यात आला आहे. सर्वेअर केवळ बुधवारी गडचिरोली येथे येतात. स्वतंत्र कार्यालय नसल्याने उद्योजकांना भूखंडाविषयी मार्गदर्शन मिळत नाही. अनेकांना स्वस्त दरात एमआयडीसीत भूखंड मिळतात, हे सुध्दा माहितू नाही. त्यामुळे अनेक भूखंड रिकामे पडून आहेत. गडचिरोलीत स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.