शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लेखा-मेंढा गावात वाद पेटला

By admin | Updated: October 8, 2015 00:52 IST

बांबू वनहक्क मिळालेले देशातील पहिले गाव म्हणून प्रसिध्दीला आलेल्या मेंढालेखा गावात आता प्रचंड वाद उफाळून आला आहे.

कारवाई : २४ शेतकऱ्यांचे अतिक्रमणातील ३० नांगर, कुऱ्हाड जप्तधानोरा : बांबू वनहक्क मिळालेले देशातील पहिले गाव म्हणून प्रसिध्दीला आलेल्या मेंढालेखा गावात आता प्रचंड वाद उफाळून आला आहे. मागील सहा महिन्यांपासून लेखावासीयांना मेंढावासीयांनी मेंढा जंगल परिसरात प्रवेश नाकारल्याने लेखावासीय त्रस्त झाले आहे. लेखा हद्दीत कक्ष क्रमांक ५१०, ५१२ मध्ये मेंढा येथील २४ शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. त्या ठिकाणी असलेले तीन नांगर, तीन कुऱ्हाडी, पावडे, टिकास, वांगे मिरचीचे रोप बुधवारी जप्त करण्याची कारवाई लेखावासीयांकडून करण्यात आली. त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. सुमारे ७० ते ८० एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले. लेखा येथील वन हक्क समितीने ३१ मे २०१५, २० जून २०१५ व ३१ जून २०१५ रोजी नोटीसा पाठवून लेखा गावाला जंगलाचे क्षेत्र व चराई क्षेत्र कमी असल्याने त्या जागेवर वृक्ष लागवड, गुरे चारण्याकरिता आवश्यकता आहे. त्यामुळे मेंढावासीयांनी केलेले अतिक्रमण खाली करण्याची मागणी केली होती. सदर नोटीसची माहिती वन विभाग व धानोरा तालुका दंडाधिकारी यांना देऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सुमारे २५० महिला व पुरूषांनी कंपार्टमेंट नंबर ५१०, ५१२ मधील नांगर व इतर सामग्री जप्त केली. ती ट्रॅक्टरमध्ये भरून धानोरा वन कार्यालयात आणून जमा करण्यात आली. सदर कारवाईचे पत्र पोलीस स्टेशन, वन विभाग यांनाही पाठविण्यात आले. ही कारवाई वनहक्क समितीचे सदस्य रामचंद्र जेनू राऊत, विनोद विठ्ठल लेनगुरे, रमेश रामचंद्र सोनुले, महागू जोगी उईके, साधुराम चैतू मडावी, चिनू नवलू दुगा, मधुकर रैजी तिरंगे, सुनीता झंझाळ, ताराबाई मैन, लता वाढई, कुंदा लेनगुरे, चंद्रभागा कोसरे, सुरेश वाढई यांच्या पुढाकाराने पार पाडण्यात आली. यापूर्वी ६ जुलै २०१५ ला वन हक्क समितीने लेखा येथील २४ शेतकऱ्यांचे दावे नाकारून तसा अहवाल धानोरा तहसीलदाराकडे पाठविला होता. त्यात मेंढावासीयांकडे स्वत:ची जमीन उपलब्ध आहे व लेखा येथील रहिवासी नसल्याने त्यांचा हक्क नाकारण्यात आला व ४० ग्रामवासीय भूमीहिन असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, मेंढाच्या २४ शेतकऱ्यांनी पट्टे देण्यासाठी वन हक्क समितीकडे अर्ज दिले आहे. ते पट्टे फेटाळता येत नाही, असे सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी म्हटले आहे. एकूणच लेखा-मेंढा गावातील वाद आता चव्हाट्यावर आला असून श्रीमंत गाव म्हणून गणना होणाऱ्या या गावात आता वाद वाढले आहेत. (तालुका प्रतिनिधी)