शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

आष्टी तालुका निर्मितीसाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 20:55 IST

सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनिर्णय व्हावा : जि.प. सदस्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आष्टी तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, चामोर्शी तालुका निर्माण झाला तेव्हापासून आष्टी तालुका व्हावा, अशी मागणी होती. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर ३५ किमी असल्याने तहसील, न्यायालय व इतर कामासाठी चामोर्शीला जाणे शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. गरीब व सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आष्टी येथे शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय तसेच तालुक्यातील पहिले अनुदानित महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, पेट्रोलपंप, जि.प. बांधकाम, सिंचाई व सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये असून सर्व सोयीसुविधायुक्त विश्रामगृह आहे.अनखोडा, गणपूर (रै.), इल्लूर, ठाकरी, मार्र्कंडा (कं.), येनापूर, कोनसरी आदी मोठी गावे या भागात समाविष्ट आहेत. इल्लूर पेपरमिल जवळ असून भौगोलिक पार्श्वभूमी आष्टीला लाभली आहे. भविष्यात होत असलेल्या हायवेचे आष्टी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे सोयीसाठी आष्टी तालुक्याची निर्मिती करावी, असे पंदिलवार यांनी म्हटले आहे.