शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

आष्टी तालुका निर्मितीसाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 20:55 IST

सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनिर्णय व्हावा : जि.प. सदस्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आष्टी तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, चामोर्शी तालुका निर्माण झाला तेव्हापासून आष्टी तालुका व्हावा, अशी मागणी होती. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर ३५ किमी असल्याने तहसील, न्यायालय व इतर कामासाठी चामोर्शीला जाणे शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. गरीब व सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आष्टी येथे शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय तसेच तालुक्यातील पहिले अनुदानित महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, पेट्रोलपंप, जि.प. बांधकाम, सिंचाई व सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये असून सर्व सोयीसुविधायुक्त विश्रामगृह आहे.अनखोडा, गणपूर (रै.), इल्लूर, ठाकरी, मार्र्कंडा (कं.), येनापूर, कोनसरी आदी मोठी गावे या भागात समाविष्ट आहेत. इल्लूर पेपरमिल जवळ असून भौगोलिक पार्श्वभूमी आष्टीला लाभली आहे. भविष्यात होत असलेल्या हायवेचे आष्टी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे सोयीसाठी आष्टी तालुक्याची निर्मिती करावी, असे पंदिलवार यांनी म्हटले आहे.