शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजला ६९६ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. १० हजार १९९ हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम निधीअभावी आणि सुधारित मान्यतेअभावी अडले होते. ते आता मार्गी लागले आहे. वैनगंगा नदीच्या डाºया तिरावर कोटगलजवळ असलेल्या कोटगल उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

ठळक मुद्देपुढील वर्षापर्यंत शेतीला पाणी : कोटगल, हल्दीपुरानी, कोसरी योजना अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या नद्यांचे वरदान लाभूनही वनकायद्यामुळे मोठ्या प्रकल्पांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता उपसा सिंचन योजनांमुळे दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही योजना आता अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी त्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजला ६९६ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. १० हजार १९९ हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम निधीअभावी आणि सुधारित मान्यतेअभावी अडले होते. ते आता मार्गी लागले आहे. वैनगंगा नदीच्या डाऱ्यां तिरावर कोटगलजवळ असलेल्या कोटगल उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ९ गावांमधील ३ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन करणाऱ्या या उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. शिर्ष कामे जून २०२० पर्यंत पूर्ण होणार असून वितरण प्रणालीची कामे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हल्दीपुरानी उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची प्रतिक्षा आहे. ती मिळताच या योजनेच्या कामाला गती येणार आहे. सध्या पंपगृहाचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले असून उर्ध्वनलिकेचे काम ९० टक्के झाले आहे. जून २०२० पर्यंत शिर्ष कामे तर वितरण प्रणालीचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होऊ शकते.कोसरी प्रकल्पाचे धरण काम पूर्ण झाले आहे. वितरण प्रणालीचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.वेळेत निधी मिळण्यासाठी प्रयत्न गरजेचेजिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांसाठी वेळोवेळी निधी मिळण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. निधीअभावी कामे अर्धवट होऊन प्रकल्पांची किंमत वाढते. पण ज्या प्रकल्पांचे काम ७० टक्केपेक्षा जास्त झाले आहे त्यांना प्राधान्याने निधी दिल्यास प्रकल्प लवकर पूर्ण होऊन शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळू शकेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प