शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जिल्ह्यात धान रोवणीच्या कामास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:08 IST

जुलै महिन्यात १५ ते २० दिवसात पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे.

ठळक मुद्देजलसाठ्यात वाढ : पावसाच्या पुनरागमनाने जिल्हाभरातील शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जुलै महिन्यात १५ ते २० दिवसात पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाने धान पिकाच्या रोवणीस वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आर्द्रा व पुनर्वसू हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतजमिनील धान पºहे करपण्यास सुरूवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. रविवारीही रात्रीपासून दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यात पाणी वाढल्यामुळे याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतीक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा-अर्चा करून वरूण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात येत होते. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर २५ जून पासून पाऊस सुरू झाला. तो पाऊस अद्यापही कायम आहे.दमदार व संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले, त्यांचे पऱ्हे सुध्दा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, गडचिरोली तालुक्यासह अनेक ठिकाणच्या शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठे शेतकरी बाहेरगावावरून स्वत:च्या ट्रॅक्टरने महिला व पुरूष मजूर गावात आणून रोवणीच्या कामास वेग दिला आहे. ज्या गावात बहुतांश लोकांकडे शेतजमीन आहे, असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास मजूर म्हणून जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजुराचा आधार घेतला जात आहे. एकूणच सर्वत्र धानपिक रोवणीची लगबग सुरू झाली आहे.ट्रॅक्टरचे भाडे वाढलेधानपीक रोवणीसाठी चिखलणी करणे आवश्यक असते. यासाठी लाकडी नांगराचे दिवसभराचे भाडे ४०० रुपये घेतले जातात. तर ट्रॅक्टर चिखलणीसाठी वापरल्यास ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहे. ट्रॅक्टर मालकांना आता रोवणीच्या निमित्ताने सुगीचे दिवस आले आहे. झटपट रोवणी उरकण्यासाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. दोन वर्षात ट्रॅक्टरचे भाडे वाढले.

टॅग्स :agricultureशेती