शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

आमगाव (बु.) पाच वर्षांसाठी दत्तक

By admin | Updated: December 13, 2015 01:32 IST

गावाचा विकास होईल तरच देशाचा विकास शक्य आहे, हा मूलमंत्र जपत स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाने तालुक्यातील ...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयाचा पुढाकार : रासेयो विभागातर्फे ग्रामविकास नियोजनावर ग्रामपंचायतीत चर्चादेसाईगंज : गावाचा विकास होईल तरच देशाचा विकास शक्य आहे, हा मूलमंत्र जपत स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाने तालुक्यातील आमगाव (बु.) गाव पुढील पाच वर्षांसाठी दत्तक घेण्याचे ठरविले आहे. गाव विकासाचा नियोजन आराखडा तयार करण्याच्या हेतूने आमगाव (बु.) येथे ग्राम पंचायत सभागृहात नुकतीच सभा आयोजित करून गाव विकासासंदर्भात ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेला सरपंच अनिल चंडीकार, उपसरपंच योगेश नाकतोडे, पोलीस पाटील प्रतिमा बोदेले, ग्राम सचिव पेशने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाकतोडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश धोटे, प्रा. निहार बोदेले, प्रा. नीलेश हलामी आदी उपस्थित होते. पाच वर्षांमध्ये दत्तक गावाला आदर्श गाव बनविण्याच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता वास्तविक परिस्थितीच्या अभ्यासाअंती ग्राम विकासाचे नियोजन सभेत करण्यात आले. महाविद्यालयातील रासेयो विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने समस्यांचे निराकरण व योजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गावातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात महाविद्यालय कटिबद्ध असून आमगाव (बु.) आदर्श गाव बनेल असा आशावाद प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांनी सभेत व्यक्त केला. सभेला डॉ. गहाणे, डॉ. एच. बी. धोटे, डॉ. जे. पी. देशमुख, डॉ. चावके, ग्रा. पं. सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)विकासात्मक पैलूंवर राहणार भरगावाच्या विकासात्मक बाबींना प्राधान्य देत हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे, शेतीसाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम’, गावातील अतिक्रमण दूर करणे, शिक्षण, बाल आरोग्य, महिला सक्षमीकरण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, व्यसनाधीनता दूर करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, पशुचिकित्सा, सामाजिक जागृती, कृषीविषयक व कृषी पूरक योजना, रोजगार मार्गदर्शन आदी विषयांवर गाव विकास नियोजन आराखड्यात भर देण्यात आला आहे. महत्त्वपूर्ण बाबींवर सभेत विचारमंथन करण्यात आले.