शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव (बु.) पाच वर्षांसाठी दत्तक

By admin | Updated: December 13, 2015 01:32 IST

गावाचा विकास होईल तरच देशाचा विकास शक्य आहे, हा मूलमंत्र जपत स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाने तालुक्यातील ...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयाचा पुढाकार : रासेयो विभागातर्फे ग्रामविकास नियोजनावर ग्रामपंचायतीत चर्चादेसाईगंज : गावाचा विकास होईल तरच देशाचा विकास शक्य आहे, हा मूलमंत्र जपत स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाने तालुक्यातील आमगाव (बु.) गाव पुढील पाच वर्षांसाठी दत्तक घेण्याचे ठरविले आहे. गाव विकासाचा नियोजन आराखडा तयार करण्याच्या हेतूने आमगाव (बु.) येथे ग्राम पंचायत सभागृहात नुकतीच सभा आयोजित करून गाव विकासासंदर्भात ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेला सरपंच अनिल चंडीकार, उपसरपंच योगेश नाकतोडे, पोलीस पाटील प्रतिमा बोदेले, ग्राम सचिव पेशने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाकतोडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश धोटे, प्रा. निहार बोदेले, प्रा. नीलेश हलामी आदी उपस्थित होते. पाच वर्षांमध्ये दत्तक गावाला आदर्श गाव बनविण्याच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता वास्तविक परिस्थितीच्या अभ्यासाअंती ग्राम विकासाचे नियोजन सभेत करण्यात आले. महाविद्यालयातील रासेयो विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने समस्यांचे निराकरण व योजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गावातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात महाविद्यालय कटिबद्ध असून आमगाव (बु.) आदर्श गाव बनेल असा आशावाद प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांनी सभेत व्यक्त केला. सभेला डॉ. गहाणे, डॉ. एच. बी. धोटे, डॉ. जे. पी. देशमुख, डॉ. चावके, ग्रा. पं. सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)विकासात्मक पैलूंवर राहणार भरगावाच्या विकासात्मक बाबींना प्राधान्य देत हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे, शेतीसाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम’, गावातील अतिक्रमण दूर करणे, शिक्षण, बाल आरोग्य, महिला सक्षमीकरण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, व्यसनाधीनता दूर करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, पशुचिकित्सा, सामाजिक जागृती, कृषीविषयक व कृषी पूरक योजना, रोजगार मार्गदर्शन आदी विषयांवर गाव विकास नियोजन आराखड्यात भर देण्यात आला आहे. महत्त्वपूर्ण बाबींवर सभेत विचारमंथन करण्यात आले.