शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतात गवत कापणाऱ्या महिलेवर वाघिणीचा हल्ला; ५० मीटर फरफटत नेले जंगलात

By गेापाल लाजुरकर | Updated: September 11, 2023 14:01 IST

देसाईगंज तालुक्यातील घटना

गडचिरोली : स्वत:च्या शेतात गुरांसाठी गवत कापत असताना टी-१४ वाघिणीने हल्ला करून महिलेला जंगलात फरफट नेत ठार केले. ही घटना देसाईगंज तालुक्यातील फरी (झरी) येथे सोमवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली.

महानंदा दिनेश मोहुर्ले (५०) रा. फरी ता. देसाईगंज असे वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. महानंदा मोहुर्ले ही महिला सकाळी ९:३० वाजता घरून आपल्या शेतावर गुरांसाठी गवत कापण्यासाठी  निघाली. याचवेळी त्यांच्या पतीने ‘तू पुढे जात राहा, मी येतो’ असे सांगितले. तेव्हा महानंदा ही एका दाम्पत्याच्या दुचाकीवर बसून गावापासून एक किमी अतंरावर असलेले आपले शेत गाठले. तेथे तिघेही गवत कापायला लागले. मोहुर्ले यांची शेती झुडपी जंगलाला अगदी लागून आहे.

महानंदा ही जंगलालगतच्या धुऱ्यावर गवत कापण्यात व्यस्त असतानाच झुडपातून टी-१४ वाघिणीने तिच्यावर हल्ला केला. परंतु याचा सुगावा दुसऱ्या बांधीत असलेल्या जोडप्याला आला नाही. काही वेळातच महानंदा यांचे पती दिनेश हे शेतात पोहोचले. मात्र त्यांना महानंदा दिसली  नाही. त्यांनी गवत कापलेल्या भागात पाहिले असता वाघिणीच्या पाऊलखुणा दिसून आल्या. त्यांनी याचवेळी  त्या भागात शोधले असता काही ठिकाणी रक्त सांडलेले दिसून आले. पुढे महानंदा यांचा मृतदेह दिसून आला. वाघिणीने महानंदा यांना ५० मीटर अंतरावर फरफटत जंगलात नेले होते. महानंदा यांच्या पश्चात पती, तसेच  विवाहित दोन मुले, सुना व नातवंड आहेत.

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोली