शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

फळ पिकांची ९९ हजार कलमे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:19 IST

गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयाला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागवडीकडे वळू शकतो.

ठळक मुद्देरोहयोचा उपक्रम : ७३९ हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्याला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागवडीकडे वळू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध फळ झाडांची ९९ हजार कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. या पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. त्यामुळे ज्या शेतकºयांकडे सिंचनाची गरज आहे, असेच शेतकरी धानपिकाची लागवड करतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी त्यांची शेतजमीन पडिक ठेवतात. या जमिनीत फळझाडांची लागवड करणे शक्य आहे. शेतात एक विहीर जरी खोदली तरी फळबाग लावणे शक्य होते. शासनाच्या विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना विहीरही खोदून दिली जाते. एकंदरीतच फळ पिकांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास पडिक असलेली हजारो एकर शेतजमीन पिकाखाली येण्यास मदत होईल. तसेच फळबाग लागवडीतून धानपिकाच्या शेतीपेक्षा अधिक उत्पादन मिळते.येथील शेतजमीन व वातावरण फळ लागवडीस पोषक असले तरी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तसेच फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास शेतकरी तयार नाही. त्यामुळे शेतकरी फळ पिकांची लागवड करीत नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास मात्र शेतकरी फळ पिकांची लागवड करू शकेल.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षात ९४ हेक्टरवर विविध फळझाडांची लागवड झाली आहे. याही वर्षी शेतकऱ्यांना फळझाडांची कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना फळझाडांची कलमे वितरित करायची आहेत, त्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी फळझाड लागवडीसाठी सदर शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन तयार करून ठेवली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात सुमारे ९९ हजार फळझाडांची कलमे व रोपे उपलब्ध आहेत. पावसाळ्यात त्यांचे वितरण शेतकºयांना केले जाणार आहे.आंबा पिकाला सर्वाधिक पसंतीआंबा पिकासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण योग्य आहे. तसेच जमीन सुद्धा सुपीक आहे. त्यामुळे आंबा पिकाचे उत्पादन चांगले होते. परिणामी शेतकऱ्यांकडून आंबा पिकांच्या रोपट्यांची मागणी सर्वाधिक होते. २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे ३५० हेक्टरवर आंबा पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आंबा झाडांची ३३ हजार कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानंतर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा या फळझाडांची प्रत्येकी ५० हेक्टर क्षेत्रावर लागवड यावर्षी करण्याचे लक्षांक ठेवण्यात आले आहे.चिकु पिकाचेही गडचिरोली जिल्ह्यात चांगले उत्पादन होते. गडचिरोली जिल्ह्यातील चिकुचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे चिकुला नागपूर बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. गडचिरोलीचे चिकू हे नागपूर बाजारपेठेत आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.मागील वर्षी ९५ हेक्टरवर फळझाडांची लागवडमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील वर्षी सुमारे ९४.७७ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड करण्यात आली. विविध रोपवाटिकांमधून २ हजार ३०० रोपटे लावण्यात आले. ६६ शेतकºयांनी फळझाडांची लागवड केली आहे. मागील वर्षी सुद्धा सर्वाधिक ९०.७९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड झाली आहे. त्यानंतर २.१४ हेक्टर क्षेत्रावर फणस, ०.८४ हेक्टर क्षेत्रावर कागदी लिंबू तर १ हेक्टर क्षेत्रावर शेवगा पिकाची लागवड झाली आहे.

टॅग्स :fruitsफळेMangoआंबा