शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

फळ पिकांची ९९ हजार कलमे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:19 IST

गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयाला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागवडीकडे वळू शकतो.

ठळक मुद्देरोहयोचा उपक्रम : ७३९ हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्याला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागवडीकडे वळू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध फळ झाडांची ९९ हजार कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. या पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. त्यामुळे ज्या शेतकºयांकडे सिंचनाची गरज आहे, असेच शेतकरी धानपिकाची लागवड करतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी त्यांची शेतजमीन पडिक ठेवतात. या जमिनीत फळझाडांची लागवड करणे शक्य आहे. शेतात एक विहीर जरी खोदली तरी फळबाग लावणे शक्य होते. शासनाच्या विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना विहीरही खोदून दिली जाते. एकंदरीतच फळ पिकांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास पडिक असलेली हजारो एकर शेतजमीन पिकाखाली येण्यास मदत होईल. तसेच फळबाग लागवडीतून धानपिकाच्या शेतीपेक्षा अधिक उत्पादन मिळते.येथील शेतजमीन व वातावरण फळ लागवडीस पोषक असले तरी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तसेच फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास शेतकरी तयार नाही. त्यामुळे शेतकरी फळ पिकांची लागवड करीत नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास मात्र शेतकरी फळ पिकांची लागवड करू शकेल.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षात ९४ हेक्टरवर विविध फळझाडांची लागवड झाली आहे. याही वर्षी शेतकऱ्यांना फळझाडांची कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना फळझाडांची कलमे वितरित करायची आहेत, त्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी फळझाड लागवडीसाठी सदर शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन तयार करून ठेवली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात सुमारे ९९ हजार फळझाडांची कलमे व रोपे उपलब्ध आहेत. पावसाळ्यात त्यांचे वितरण शेतकºयांना केले जाणार आहे.आंबा पिकाला सर्वाधिक पसंतीआंबा पिकासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण योग्य आहे. तसेच जमीन सुद्धा सुपीक आहे. त्यामुळे आंबा पिकाचे उत्पादन चांगले होते. परिणामी शेतकऱ्यांकडून आंबा पिकांच्या रोपट्यांची मागणी सर्वाधिक होते. २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे ३५० हेक्टरवर आंबा पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आंबा झाडांची ३३ हजार कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानंतर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा या फळझाडांची प्रत्येकी ५० हेक्टर क्षेत्रावर लागवड यावर्षी करण्याचे लक्षांक ठेवण्यात आले आहे.चिकु पिकाचेही गडचिरोली जिल्ह्यात चांगले उत्पादन होते. गडचिरोली जिल्ह्यातील चिकुचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे चिकुला नागपूर बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. गडचिरोलीचे चिकू हे नागपूर बाजारपेठेत आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.मागील वर्षी ९५ हेक्टरवर फळझाडांची लागवडमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील वर्षी सुमारे ९४.७७ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड करण्यात आली. विविध रोपवाटिकांमधून २ हजार ३०० रोपटे लावण्यात आले. ६६ शेतकºयांनी फळझाडांची लागवड केली आहे. मागील वर्षी सुद्धा सर्वाधिक ९०.७९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड झाली आहे. त्यानंतर २.१४ हेक्टर क्षेत्रावर फणस, ०.८४ हेक्टर क्षेत्रावर कागदी लिंबू तर १ हेक्टर क्षेत्रावर शेवगा पिकाची लागवड झाली आहे.

टॅग्स :fruitsफळेMangoआंबा