शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

९९ ग्रामपंचायतीत १० नामांकन अर्ज!

By admin | Updated: June 16, 2014 23:29 IST

निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

नक्षल्यांची दहशत : ९७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूकदिगांबर जवादे - गडचिरोलीनिवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या एकूण ९९ ग्रामपंचायतीत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी केवळ १० नामाकंन भरण्यात आले आहेत. नक्षल्यांकडून लोकप्रतिनिधींची केली जाणारी हत्या व त्या गावामध्ये त्या प्रवर्गाचा उमेदवार नसणे हे कारण माणले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामध्ये मोडतात. नक्षल्यांचा लोकशाही व्यवस्थेस विरोध असल्याने ते निवडणुकीचा प्रचंड प्रमाणात राग करतात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवरीही हल्ले करतात. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक निवडणुकीमध्ये सहजासहजी सहभाग घेत नाही. एवढेच नाही तर कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच पद सांभाळण्यासही तयार होत नाही. अहेरी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, कोरची, एटापल्ली या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. मात्र रोटेशननुसार इतरही प्रवर्गांना ग्रामपंचायतमध्ये आरक्षण दिले जाते. कधी-कधी या प्रवर्गाचा नागरिकच त्या ग्रामपंचायतीमध्ये राहत नसल्याने अर्ज भरल्या जात नाही. पर्यायाने त्या ठिकाणची जागा शिल्लक राहते. निवडणूक आयोगाने अहेरी तालुक्यातील येडमपल्ली व रेगुलवाही या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व त्याच तालुक्यातील इतर २१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येडमपल्ली ही ग्रामपंचायत नक्षलग्रस्त भागात येते नुकत्याच लोकप्रतिनिधींच्या हत्या करण्यात आल्या. नागरिकांमध्ये दहशत असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून जीवाची जोखीम उचलण्याची त्यांची तयारी नाही. या ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. रेगुलवाही येथे केवळ तीन नागरिकांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. इतर २१ ठिकाणी मात्र एकही नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला नाही. एटापल्लीच्या पं.स. सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची १० दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली. याच तालुक्यातील सुमारे २३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र एकही नामांकन अर्ज आला नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.