शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

९९ ग्रामपंचायतीत १० नामांकन अर्ज!

By admin | Updated: June 16, 2014 23:29 IST

निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

नक्षल्यांची दहशत : ९७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूकदिगांबर जवादे - गडचिरोलीनिवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या एकूण ९९ ग्रामपंचायतीत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी केवळ १० नामाकंन भरण्यात आले आहेत. नक्षल्यांकडून लोकप्रतिनिधींची केली जाणारी हत्या व त्या गावामध्ये त्या प्रवर्गाचा उमेदवार नसणे हे कारण माणले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामध्ये मोडतात. नक्षल्यांचा लोकशाही व्यवस्थेस विरोध असल्याने ते निवडणुकीचा प्रचंड प्रमाणात राग करतात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवरीही हल्ले करतात. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक निवडणुकीमध्ये सहजासहजी सहभाग घेत नाही. एवढेच नाही तर कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच पद सांभाळण्यासही तयार होत नाही. अहेरी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, कोरची, एटापल्ली या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. मात्र रोटेशननुसार इतरही प्रवर्गांना ग्रामपंचायतमध्ये आरक्षण दिले जाते. कधी-कधी या प्रवर्गाचा नागरिकच त्या ग्रामपंचायतीमध्ये राहत नसल्याने अर्ज भरल्या जात नाही. पर्यायाने त्या ठिकाणची जागा शिल्लक राहते. निवडणूक आयोगाने अहेरी तालुक्यातील येडमपल्ली व रेगुलवाही या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व त्याच तालुक्यातील इतर २१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येडमपल्ली ही ग्रामपंचायत नक्षलग्रस्त भागात येते नुकत्याच लोकप्रतिनिधींच्या हत्या करण्यात आल्या. नागरिकांमध्ये दहशत असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून जीवाची जोखीम उचलण्याची त्यांची तयारी नाही. या ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. रेगुलवाही येथे केवळ तीन नागरिकांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. इतर २१ ठिकाणी मात्र एकही नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला नाही. एटापल्लीच्या पं.स. सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची १० दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली. याच तालुक्यातील सुमारे २३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र एकही नामांकन अर्ज आला नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.