शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

९९ ग्रामपंचायतीत १० नामांकन अर्ज!

By admin | Updated: June 16, 2014 23:29 IST

निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

नक्षल्यांची दहशत : ९७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूकदिगांबर जवादे - गडचिरोलीनिवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या एकूण ९९ ग्रामपंचायतीत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी केवळ १० नामाकंन भरण्यात आले आहेत. नक्षल्यांकडून लोकप्रतिनिधींची केली जाणारी हत्या व त्या गावामध्ये त्या प्रवर्गाचा उमेदवार नसणे हे कारण माणले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामध्ये मोडतात. नक्षल्यांचा लोकशाही व्यवस्थेस विरोध असल्याने ते निवडणुकीचा प्रचंड प्रमाणात राग करतात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवरीही हल्ले करतात. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक निवडणुकीमध्ये सहजासहजी सहभाग घेत नाही. एवढेच नाही तर कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच पद सांभाळण्यासही तयार होत नाही. अहेरी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, कोरची, एटापल्ली या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. मात्र रोटेशननुसार इतरही प्रवर्गांना ग्रामपंचायतमध्ये आरक्षण दिले जाते. कधी-कधी या प्रवर्गाचा नागरिकच त्या ग्रामपंचायतीमध्ये राहत नसल्याने अर्ज भरल्या जात नाही. पर्यायाने त्या ठिकाणची जागा शिल्लक राहते. निवडणूक आयोगाने अहेरी तालुक्यातील येडमपल्ली व रेगुलवाही या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व त्याच तालुक्यातील इतर २१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येडमपल्ली ही ग्रामपंचायत नक्षलग्रस्त भागात येते नुकत्याच लोकप्रतिनिधींच्या हत्या करण्यात आल्या. नागरिकांमध्ये दहशत असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून जीवाची जोखीम उचलण्याची त्यांची तयारी नाही. या ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. रेगुलवाही येथे केवळ तीन नागरिकांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. इतर २१ ठिकाणी मात्र एकही नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला नाही. एटापल्लीच्या पं.स. सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची १० दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली. याच तालुक्यातील सुमारे २३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र एकही नामांकन अर्ज आला नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.