शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

९९८ केंद्रांवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:49 IST

फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषद व जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील पंचायत समितीच्या ...

प्रशासनाची तयारी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकदिलीप दहेलकर गडचिरोलीफेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषद व जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१७ या अहर्ता दिनांकावर आधारित जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी तयार केली आहे. यानुसार महिला व पुरूष मिळून एकूण ७ लाख १८ हजार ३४३ मतदार एकूण ९९८ केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबई येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गडचिरोली जिल्ह्यातील विपरित परिस्थिती लक्षात घेऊन दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यात निवडणूक होणार आहे. यामध्ये गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा या तालुक्यांचा समावेश आहे. येथे १६ फेब्रुवारीला मतदान होणार असून २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत नामांकन अर्ज भरले जातील. तर दुसऱ्या टप्प्यात अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड येथे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. २१ फेब्रुवारी रोजी येथे मतदान होणार आहे. १ ते ६ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. सदर निवडणुकीत ३६० केंद्र साधारण स्थितीतले राहणार आहेत. जि.प., पं.स. निवडणुकीत ६ लाख १० हजार ९९९ ग्रामीण मतदार तर १ लाख ७ हजार ३४४ शहरी मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रशासनातर्फे आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.३३४ मतदान केंद्र अतिसंवेदनशीलजिल्हा परिषदेच्या ५१ व पंचायत समितीच्या १०२ जागांसाठी गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात एकूण ९९८ मतदान केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ३३४ मतदान केंद्र अतिसंवेदनशील तर ३०४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांमध्ये कोरची तालुक्यातील २२, कुरखेडा तालुक्यातील ३२, देसाईगंज ९, आरमोरी २०, धानोरा ४५, गडचिरोली ७, चामोर्शी १६, मुलचेरा ९, एटापल्ली ७०, भामरागड २१, अहेरी ४६ व सिरोंचा तालुक्यात ३७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक ७० अतिसंवेदनशील मतदान केंद्र राहणार आहेत.जि.प, पं.स निवडणुकीसाठी ३०४ केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये कोरची तालुक्यातील १७, कुरखेडा ४२, देसाईगंज ८, आरमोरी ३५, धानोरा २३, गडचिरोली १२, चामोर्शी ५६, मुलचेरा ४०, एटापल्ली १, भामरागड ३, अहेरी ३६ व सिरोंचा तालुक्यात ३१ केंद्रांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ५६ संवेदनशील केंद्र आहेत.