शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

९९७ झाडांची होणार कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:57 IST

मूल ते गडचिरोलीपर्यंत ९३० क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वैनगंगा नदी ते इंदिरानगरपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यावर असल्याने....

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : वन विभागामार्फत सर्वेक्षण, वैनगंगा नदीपासून कामाला सुरुवात

दिगांबर जवादे।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मूल ते गडचिरोलीपर्यंत ९३० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वैनगंगा नदी ते इंदिरानगरपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यावर असल्याने ही झाडे तोडली जाणार आहेत. या संदर्भातील कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे.गडचिरोली-चंद्रपूर या राज्य महामार्गाला मागील वर्षी केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. चंद्रपूर ते गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-छत्तीसगड राज्याची सीमेपर्यंत एकच राष्ट्रीयय महामार्ग आहे. एवढे काम एकाच कंत्राटदाराला व एकाचवेळी करणे शक्य नसल्याने या कामाचे तुकडे पाडण्यात आले आहेत. त्यापैकी मूल ते गडचिरोलीपर्यंतचा एक तुकडा असून या कामाला सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाडजवळून कामाला सुरूवात झाली होती. दोन महिन्यात सदर काम गडचिरोली जिल्ह्यातील पुलखलपर्यंत आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीजवळील चकपीरंजी गावापर्यंत काम पोहोचले आहे. या मार्गाचे रूंदीकरण केले जात आहे. मार्गाच्या बाजुला असलेली झाडे कापावी लागणार आहे. यासाठी वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यात सापडत असल्याने सदर झाडे तोडली जाणार आहेत. नगर परिषद क्षेत्रात झाडे तोडण्याबाबत परवानगी देण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. तर ग्रामपंचायत क्षेत्रातील झाडे ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतर तोडली जाणार आहेत. इतर झाडांना वन विभाग परवानगी देणार आहे. त्याबाबतची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे.या प्रजातीची झाडे तोडणारवैनगंगा नदी ते गडचिरोली शहरातील इंदिरानगरातील वन विभागाच्या नाक्यापर्यंत एकूण ९९७ झाडे तोडली जाणार आहेत. यामध्ये किन्हीची १७ झाडे, पेंटाफार्मची २३८ झाडे, करंजी १३७, मोहा १२, पा.सिरस २८, सिरस १०६, चिंच ६, साग ३९, कॅशीया ५०, निलगिरी १०, बोर ११, बाभूळ ४१, निम २४, हिवर २१०, वड ४ व आंबा, कवट, काटेसावरची प्रत्येकी दोन आदी झाडे तोडली जाणार आहेत.कार्यवाही सुरूझाडे तोडण्याची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे. सर्वेक्षणानंतर आता जाहीनामा काढला जाणार आहे. त्यामध्ये एखाद्या खासगी व्यक्तीचे झाड असल्यास त्यावर आक्षेप मागितले जाणार आहेत. आक्षेप स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या परवानगीनंतर झाडे तोडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तोडलेल्या झाडांची किंमत ठरविली जाणार आहे. सदर किंमत राष्ट्रीय महामार्ग विभाग संबंधित यंत्रणांना देणार आहे.