शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

९२ टक्के झाडे जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:52 IST

१३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देवनविभागामार्फत पाहणी : ३३ लाख वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, यासाठी राज्य शासनाने वृक्षलागवड योजना सुरू केली आहे. विद्यमान भाजप शासनाने २०१६ मध्ये दोन कोटी, २०१७ मध्ये चार कोटी व २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार राज्यभरात वृक्षांची लागवड सुद्धा करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागा अंतर्गत मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वनविभागालाच दिले जाते. वनविभागाकडे काम करणारी यंत्रणा असल्याने लावलेली बहुतांश वृक्ष जगतात सुद्धा. २०१८ मध्ये गडचिरोली वनवृत्ताने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ वृक्षांची लागवड केली होती. वनविभागाने लावलेले बहुतांश वृक्ष जंगलात आहेत. मागील काही वर्षांपासून वनविभागाने जंगलात गुरे चराईला प्रतिबंध घातले आहे. त्यामुळे गुरांपासून झाडांचे होणारे नुकसान थांबण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर पावसाळा राहत असल्याने लावलेली बहुतांश झाडे जगतात. वनविभाग केवळ त्यांची देखरेख करण्याचे काम करतात. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्याने लावलेल्या वृक्षांसाठी योग्य वातावरण होते. त्यामुळे बहुतांश झाडे जगली आहेत.लावलेल्या झाडांची माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये संबंधित विभागाने लावलेली झाडे व आतापर्यंत जीवंत असलेली झाडे टाकली जातात. मात्र इतर यंत्रणा झाडांची माहिती टाकण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने केवळ वनविभागाने लावलेल्या झाडांचीच माहिती उपलब्ध आहे. जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे १६६ ठिकाणी ३३ लाख १५ हजार ६१३ झाडे लावली होती. त्यापैकी ३० लाख ५६ हजार २०५ झाडे जीवंत आहेत.सामाजिक वनीकरणची ९९ टक्के झाडे जगलीसामाजिक वनीकरण विभागाने १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत २ लाख ७ हजार झाडे लावली होती. त्यापैकी २ लाख ५ हजार ८६ झाडे जीवंत आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ९९.०८ टक्के एवढे आहे. उन्हाळा लागल्यानंतर मात्र यातील काही झाडे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक वनीकरण विभाग सुद्धा जंगलामध्येच झाडे लावत असल्याने इतर यंत्रणांच्या तुलनेत या विभागाची झाडे अधिक प्रमाणात जगतात.ग्रामपंचायती रस्त्याच्या बाजूला झाडे लावतात. झाडांना कठडे सुद्धा लावले जात नाही. परिणामी अर्ध्याहून अधिक झाडे जनावरांकडूनच फस्त केली जातात. काही झाडे तर अगदी दुसऱ्याच दिवशी नष्ट केली जातात.