शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

९२ टक्के झाडे जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:52 IST

१३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देवनविभागामार्फत पाहणी : ३३ लाख वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, यासाठी राज्य शासनाने वृक्षलागवड योजना सुरू केली आहे. विद्यमान भाजप शासनाने २०१६ मध्ये दोन कोटी, २०१७ मध्ये चार कोटी व २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार राज्यभरात वृक्षांची लागवड सुद्धा करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागा अंतर्गत मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वनविभागालाच दिले जाते. वनविभागाकडे काम करणारी यंत्रणा असल्याने लावलेली बहुतांश वृक्ष जगतात सुद्धा. २०१८ मध्ये गडचिरोली वनवृत्ताने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ वृक्षांची लागवड केली होती. वनविभागाने लावलेले बहुतांश वृक्ष जंगलात आहेत. मागील काही वर्षांपासून वनविभागाने जंगलात गुरे चराईला प्रतिबंध घातले आहे. त्यामुळे गुरांपासून झाडांचे होणारे नुकसान थांबण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर पावसाळा राहत असल्याने लावलेली बहुतांश झाडे जगतात. वनविभाग केवळ त्यांची देखरेख करण्याचे काम करतात. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्याने लावलेल्या वृक्षांसाठी योग्य वातावरण होते. त्यामुळे बहुतांश झाडे जगली आहेत.लावलेल्या झाडांची माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये संबंधित विभागाने लावलेली झाडे व आतापर्यंत जीवंत असलेली झाडे टाकली जातात. मात्र इतर यंत्रणा झाडांची माहिती टाकण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने केवळ वनविभागाने लावलेल्या झाडांचीच माहिती उपलब्ध आहे. जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे १६६ ठिकाणी ३३ लाख १५ हजार ६१३ झाडे लावली होती. त्यापैकी ३० लाख ५६ हजार २०५ झाडे जीवंत आहेत.सामाजिक वनीकरणची ९९ टक्के झाडे जगलीसामाजिक वनीकरण विभागाने १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत २ लाख ७ हजार झाडे लावली होती. त्यापैकी २ लाख ५ हजार ८६ झाडे जीवंत आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ९९.०८ टक्के एवढे आहे. उन्हाळा लागल्यानंतर मात्र यातील काही झाडे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक वनीकरण विभाग सुद्धा जंगलामध्येच झाडे लावत असल्याने इतर यंत्रणांच्या तुलनेत या विभागाची झाडे अधिक प्रमाणात जगतात.ग्रामपंचायती रस्त्याच्या बाजूला झाडे लावतात. झाडांना कठडे सुद्धा लावले जात नाही. परिणामी अर्ध्याहून अधिक झाडे जनावरांकडूनच फस्त केली जातात. काही झाडे तर अगदी दुसऱ्याच दिवशी नष्ट केली जातात.