शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

९२ टक्के झाडे जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:52 IST

१३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देवनविभागामार्फत पाहणी : ३३ लाख वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, यासाठी राज्य शासनाने वृक्षलागवड योजना सुरू केली आहे. विद्यमान भाजप शासनाने २०१६ मध्ये दोन कोटी, २०१७ मध्ये चार कोटी व २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार राज्यभरात वृक्षांची लागवड सुद्धा करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागा अंतर्गत मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वनविभागालाच दिले जाते. वनविभागाकडे काम करणारी यंत्रणा असल्याने लावलेली बहुतांश वृक्ष जगतात सुद्धा. २०१८ मध्ये गडचिरोली वनवृत्ताने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ वृक्षांची लागवड केली होती. वनविभागाने लावलेले बहुतांश वृक्ष जंगलात आहेत. मागील काही वर्षांपासून वनविभागाने जंगलात गुरे चराईला प्रतिबंध घातले आहे. त्यामुळे गुरांपासून झाडांचे होणारे नुकसान थांबण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर पावसाळा राहत असल्याने लावलेली बहुतांश झाडे जगतात. वनविभाग केवळ त्यांची देखरेख करण्याचे काम करतात. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्याने लावलेल्या वृक्षांसाठी योग्य वातावरण होते. त्यामुळे बहुतांश झाडे जगली आहेत.लावलेल्या झाडांची माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये संबंधित विभागाने लावलेली झाडे व आतापर्यंत जीवंत असलेली झाडे टाकली जातात. मात्र इतर यंत्रणा झाडांची माहिती टाकण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने केवळ वनविभागाने लावलेल्या झाडांचीच माहिती उपलब्ध आहे. जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे १६६ ठिकाणी ३३ लाख १५ हजार ६१३ झाडे लावली होती. त्यापैकी ३० लाख ५६ हजार २०५ झाडे जीवंत आहेत.सामाजिक वनीकरणची ९९ टक्के झाडे जगलीसामाजिक वनीकरण विभागाने १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत २ लाख ७ हजार झाडे लावली होती. त्यापैकी २ लाख ५ हजार ८६ झाडे जीवंत आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ९९.०८ टक्के एवढे आहे. उन्हाळा लागल्यानंतर मात्र यातील काही झाडे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक वनीकरण विभाग सुद्धा जंगलामध्येच झाडे लावत असल्याने इतर यंत्रणांच्या तुलनेत या विभागाची झाडे अधिक प्रमाणात जगतात.ग्रामपंचायती रस्त्याच्या बाजूला झाडे लावतात. झाडांना कठडे सुद्धा लावले जात नाही. परिणामी अर्ध्याहून अधिक झाडे जनावरांकडूनच फस्त केली जातात. काही झाडे तर अगदी दुसऱ्याच दिवशी नष्ट केली जातात.