शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

९७ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST

राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९७.४७ कोटी रूपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जाचे वाटप

उद्दिष्टाच्या ८८ टक्के : राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपात पिछाडीवरचगडचिरोली : राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९७.४७ कोटी रूपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. महत्वाचे म्हणजे मागील वर्षीसुद्धा १६ आॅगस्टपर्यंत उद्दिष्टाच्या ८७ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत: खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग यांत्रिक पद्धतीने शेती कसू लागला आहे. त्याचबरोबर उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करू लागला आहे. हे सर्व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्याने कर्ज काढल्याशिवाय पर्याय उरत नाही. यापूर्वी सावकाराकडून शेतकरी कर्ज घेत होता. मात्र सावकार अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून शेतकऱ्यांची फसवणूक करीत होता. त्यामुळे शेतकरीवर्ग लुबाडला जात होता. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात ६ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत. सर्व राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामात ५२ कोटी ७३ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी या बँकांनी ३५ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ६७ टक्के एवढे आहे. ग्रामीण बँकांना दिलेल्या १२ कोटी ६५ लाख रूपये कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी त्यांनी १२ कोटी ९४ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण १०२ टक्के आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांना ४४ कोटी ४२ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४९ कोटी ११ लाख रूपये एवढे कर्ज वाटप या बँकेने केले आहे. म्हणजेच कर्ज वाटपाचे प्रमाण उद्दिष्टाच्या १११ टक्के एवढे आहे. शेतकरीवर्ग कर्ज बुडवितो, अशी चुकीची समजूत राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची झाली असल्याने या बँका शेतकऱ्याला बँकेच्या दारात उभे राहू देत नव्हत्या. मात्र ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेला शेतकऱ्याला कर्ज वाटप करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका आता काही प्रमाणात कर्जाचे वाटप करीत आहेत. तरीही त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा पाहिजे त्याप्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रीयकृत बँकांपैकी बँक आॅफ इंडियाने ११ कोटी ५३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १२ कोटी २७ लाख, कॅनरा बँकेने २० लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ५१ लाख, आयडीबीआय बँकेने ६४ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियाने ९ कोटी ८० लाख, युनियन बँक आॅफ इंडियाने ४६ लाख, असे एकूण ३५ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपाचे प्रमाण ६७ टक्के आहे. ग्रामीण बँक व सहकारी बँकांशी तुलना करता राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)