शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

९३ बालकांचे अपंगत्व झाले सुसह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:35 IST

सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून जिल्हाभरातील गरीब ९३ अपंग बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे.

ठळक मुद्देसर्वशिक्षा अभियानातून पुढाकार : नागपूर येथील खासगी रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून जिल्हाभरातील गरीब ९३ अपंग बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे.शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अपंगत्वावर उपचार करता येत असले तरी दोन वेळच्या जेवनाची भ्रांत असलेले पालक आपल्या पाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा खर्च उचलू शकत नाही. परिणामी अपंगत्वाचा भार जीवनभर वाहावा लागते. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून अस्थिव्यंग व बहुविकलांग असलेल्या विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथील प्रविरा हॉस्पीटलचे संचालक बालअस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विराज शिंगाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याने मागील आठ दिवसात गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९३ अस्थिव्यंग व बहुविकलांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रविरा हॉस्पीटलने या विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया मोफत केली असून त्यांच्या राहण्याचा, जेवनाचा व औषधीचा खर्चही याच रूग्णालयाने उचलला आहे. शस्त्रक्रियेमुळे बालकांचे अपंगत्व नाहिसे झाल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते.शस्त्रक्रियेसाठी बालकांची निवड करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानतर्फे अहेरी व गडचिरोली येथे शिबिराचे आयोजन केले होते. दोन्ही शिबिरांना २३४ अपंग विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यापैकी १२९ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी नागपूर येथे प्रत्यक्ष ९३ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सात टप्प्यांमध्ये बालकांना नागपूर येथील प्रविरा हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले. मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुडे, डीआयईसीपीडीचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील यांच्यासह सर्व शिक्षा अभियानच्या कर्मचाºयांनी पुढाकार घेतला.जनजागृतीची गरजगरीब आजारी बालकांवर मोफत उपचार करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेतात. मात्र दुर्गम भागातील नागरिकांना याबाबतची माहिती होत नाही. परिणामी त्यांच्यावर उपचार होत नाही. शिक्षण विभागाचे जाळे प्रत्येक गावात पसरले असल्याने याबाबत जनजागृतीची गरज आहे.