शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

९२ ग्रा. पं. ना कनेक्टिव्हिटी

By admin | Updated: November 2, 2015 01:11 IST

केंद्र शासनाने देशातील प्रत्येक ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

गडचिरोली : केंद्र शासनाने देशातील प्रत्येक ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा पंचायत समितीमधील ९२ ग्राम पंचायतींपर्यंत केबल टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ग्राम पंचायतींना लवकरच नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याअंतर्गतच ग्रामसभांना सर्वोच्च अधिकार बहाल करण्यात आले आहेत. अनेक ग्रामसभा गावाच्या हिताच्या दृष्टीने नियोजन करीत असल्याने गावांचा कायापालट झाला आहे. त्यामुळे आता ग्राम पंचायतीचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान थेट ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे धोरणही शासनाने अवलंबिले आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होते की नाही, त्याचबरोबर ग्रा. पं. चा कारभार गतिमान करण्यासाठी शासनाने देशभरातील सर्व ग्राम पंचायती नेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.देशातील सर्वच ग्राम पंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सध्य:स्थितीत एकूण ४५७ ग्राम पंचायती आहेत. या सर्व ग्राम पंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा या तालुक्यांमधील ग्राम पंचायती जोडण्याचे काम सुरू झाले आहे. या सहा तालुक्यांमध्ये एकूण २४२ ग्राम पंचायती आहेत. यापैकी आरमोरी तालुक्यात ३१, चामोर्शी तालुक्यात ८२, देसाईगंज तालुक्यात १९, गडचिरोली तालुक्यात ५४, कुरखेडा तालुक्यातील ४५ व मुलचेरा तालुक्यातील ११ ग्राम पंचायती पहिल्या टप्प्यात जोडण्यात येणार आहेत. सहा तालुक्यातील २४२ ग्राम पंचायतींपैकी ९२ ग्राम पंचायतींपर्यंत केबल पोहोचविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. १६८ किमी केबल टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. दुसरा टप्पा डिसेंबरनंतर सुरू होईल व जूनपर्यंत सर्व ग्राम पंचायतींना आॅप्टीकल केबलने जोडण्यात येणार आहेत. (नगर प्रतिनिधी)ब्राँडबँडपेक्षा ५० पट अधिक स्पिडग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हीटी देण्यासाठी आॅप्टीकल फायबरचा वापर केला जात आहे. आॅप्टीकल फायबरमध्ये काचाचा वापर केला जात असून त्यातून प्रकाश पाठविला जातो. दूरसंचारमधील हे अत्याधुनिक साधन आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या ब्राँडबँडसाठी कॉपर फायबरचा वापर केल्या जातो. या केबलची स्पिड केवळ दोन एमबीबीएस एवढी आहे. तर ग्राम पंचायतीसाठी वापरण्यात येत असलेल्या आॅप्टीकल फायबरची स्पिड १०० एमबीपीएस एवढी आहे.कारभार गतिमान होण्यास मदतप्रत्येक ग्राम पंचायत आॅनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्यामुळे ग्राम पंचायतीच्या प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता येण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ग्राम पंचायतीची माहिती राज्य व केंद्र शासनाला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ग्राम पंचायतीची कार्यालयीन माहिती पाठविण्यासाठी कागदी घोडे नाचवावे लागत होते. यामध्ये बराच श्रम, पैसा, वेळ खर्च होत होता. कनेक्टिव्हीटीनंतर एका मिनिटात माहिती उपलब्ध होणार आहे.