शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

८८५ आपद्ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतच

By admin | Updated: November 16, 2014 22:49 IST

१ जून ते ९ सप्टेंबर २०१४ दरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन यंदा

गडचिरोली : १ जून ते ९ सप्टेंबर २०१४ दरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन यंदा जिल्ह्यात १० नागरिक मृत्यूमुखी पडले. तर एकूण ७५ लहान, मोठे जनावरे मृत पावली. तसेच १ हजार ६३८ घरांची पडझड झाली. यापैकी प्रशासनाने अर्ध्यापेक्षा अधिक आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत दिली आहे. तर ८८५ आपद्ग्रस्त नागरिक अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. विशेष म्हणजे पूरपरिस्थिती मृत्यू झालेल्या एका नागरिकाचा मृतदेह अद्यापही सापडला नसल्याने प्रशासनाकडून या आपद्ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळू शकली नाही.यंदाच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थिीमुळे जिल्ह्यात एकूण १० नागरिक दगावले. यापैकी प्रशासनाने ९ मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे १३ लाख ५० हजार रूपयांची आर्थिक मदत प्रदान केली आहे. तर एकाचा मृतदेह न सापडल्याने दीड लाख रूपये मदत देणे शिल्लक आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात एकूण १६ नागरिक जखमी झाले. सर्व जखमी नागरिकांना प्रशासनाने एकूण १ लाख १२ हजार रूपयांची मदत दिली आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील लहान २८ व मोठे ४७ असे एकूण ७५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यापैकी ७२ जनावर मालकांना ६ लाख १९ हजार रूपयांची मदत प्रशासनाने दिली आहे. तर तीन नुकसानग्रस्त जनावर मालक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. या जनावर मालकांना प्रत्येकी १० हजार रूपये असे एकूण ३० हजार रूपये आर्थिक मदत देणे बाकी आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ हजार ५८८ घरे अंशता तर ५० घरे पूर्णत: असे एकूण १ हजार ६३८ घरांची पडझड झाली. यापैकी ७८४ पडझड झालेल्या घरमालकांना २२ लाख २५ हजार ४८८ रूपयांची आर्थिक मदत प्रशासनाने दिली आहे. तर अंशत: घरे पडलेली ८२७ व पूर्णत: घरे पडलेली २७ असे एकूण ८५४ घरांची पडझड झालेले घरमालक अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ८५४ घरमालकांना २० लाख ९ हजार ६० रूपयांची आर्थिक मदत देणे बाकी आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी आपद्ग्रस्तांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी पावसाळ्यापूर्वीच निधीची तरतूद केली जाते. मात्र गाव, तलाठी साजा व तहसील कार्यालयातील ढिसाळ नियोजनामुळे आपद्ग्रस्तांच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे उशीरा पोहोचल्यामुळे अनेक आपद्ग्रस्त नागरिक आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)