शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

८८५ आपद्ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतच

By admin | Updated: November 16, 2014 22:49 IST

१ जून ते ९ सप्टेंबर २०१४ दरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन यंदा

गडचिरोली : १ जून ते ९ सप्टेंबर २०१४ दरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन यंदा जिल्ह्यात १० नागरिक मृत्यूमुखी पडले. तर एकूण ७५ लहान, मोठे जनावरे मृत पावली. तसेच १ हजार ६३८ घरांची पडझड झाली. यापैकी प्रशासनाने अर्ध्यापेक्षा अधिक आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत दिली आहे. तर ८८५ आपद्ग्रस्त नागरिक अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. विशेष म्हणजे पूरपरिस्थिती मृत्यू झालेल्या एका नागरिकाचा मृतदेह अद्यापही सापडला नसल्याने प्रशासनाकडून या आपद्ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळू शकली नाही.यंदाच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थिीमुळे जिल्ह्यात एकूण १० नागरिक दगावले. यापैकी प्रशासनाने ९ मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे १३ लाख ५० हजार रूपयांची आर्थिक मदत प्रदान केली आहे. तर एकाचा मृतदेह न सापडल्याने दीड लाख रूपये मदत देणे शिल्लक आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात एकूण १६ नागरिक जखमी झाले. सर्व जखमी नागरिकांना प्रशासनाने एकूण १ लाख १२ हजार रूपयांची मदत दिली आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील लहान २८ व मोठे ४७ असे एकूण ७५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यापैकी ७२ जनावर मालकांना ६ लाख १९ हजार रूपयांची मदत प्रशासनाने दिली आहे. तर तीन नुकसानग्रस्त जनावर मालक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. या जनावर मालकांना प्रत्येकी १० हजार रूपये असे एकूण ३० हजार रूपये आर्थिक मदत देणे बाकी आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ हजार ५८८ घरे अंशता तर ५० घरे पूर्णत: असे एकूण १ हजार ६३८ घरांची पडझड झाली. यापैकी ७८४ पडझड झालेल्या घरमालकांना २२ लाख २५ हजार ४८८ रूपयांची आर्थिक मदत प्रशासनाने दिली आहे. तर अंशत: घरे पडलेली ८२७ व पूर्णत: घरे पडलेली २७ असे एकूण ८५४ घरांची पडझड झालेले घरमालक अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ८५४ घरमालकांना २० लाख ९ हजार ६० रूपयांची आर्थिक मदत देणे बाकी आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी आपद्ग्रस्तांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी पावसाळ्यापूर्वीच निधीची तरतूद केली जाते. मात्र गाव, तलाठी साजा व तहसील कार्यालयातील ढिसाळ नियोजनामुळे आपद्ग्रस्तांच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे उशीरा पोहोचल्यामुळे अनेक आपद्ग्रस्त नागरिक आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)