शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

जिल्ह्यातील ८८ हातपंप बंद

By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत.

उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट : सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील हातपंप नादुरूस्तगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत. यापैकी सद्य:स्थितीत तब्बल ८८ हातपंप बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हातपंप दुरूस्तीच्या कामात पंचायत समितीस्तरावरून दिरंगाई होत असल्याचा आरोप गावातील नागरिकांकडून केला जात आहे.मुलचेरा तालुक्यासह एकुण १२ तालुक्यात ग्रामपंचायती अंतर्गत एकूण ९ हजार १ हातपंप आहेत. यापैकी ७ हजार ३७२ हातपंपाच्या देखभाल व दुरूस्ती संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी करारनामे केले आहेत. करारनामे करण्यात आलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील ९१८, आरमोरी ६१८, कुरखेडा ७५३, धानोरा ८०१, चामोर्शी ८८४, अहेरी ७९१, एटापल्ली ७०८, सिरोंचा ६५६, कोरची ५१४, देसाईगंज ३३१ व भामरागड तालुक्यातील ३९८ हातपंपाचा समावेश आहे. सद्य:स्थितीत बंद असलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, आरमोरी ४, कुरखेडा ३, धानोरा ८, चामोर्शी ८, अहेरी ४, सिरोंचा १५, कोरची १, भामरागड ४ व एटापल्ली तालुक्यातील सर्वाधिक ३१ हातपंपाचा समावेश आहे.सदर ८८ हातपंप बंद असल्याने संबंधित गावातील व परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील महिन्यात जिल्हाभरातील एकूण ४३७ हातपंप बंद पडले होते. त्यापैकी ३४९ हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली. अद्यापही ८८ हातपंप बंद आहेत. पंचायत समिती प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव व हातपंप देखभाल दुरूस्तीच्या वाहनाची संख्या कमी आहे. धानोरा तालुक्यात हातपंप दुरूस्तीसाठी पंचायत समितीकडे एकच वाहन उपलब्ध आहे. परिणामी तालुक्याच्या परिसर व गावातील संख्येचा आवाका लक्षात घेता तालुक्यात लवकर वाहन पोहोचत नाही. (नगर प्रतिनिधी)खंडित वीज पुरवठ्याने अनेक नळ पाणी योजना बंदग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने तालुका मुख्यालय व मोठ्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र काही गावातील पाणी योजनेचे लाखो रूपयांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरणने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून २५ वर नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याच्या काही गावातील जलशुध्दीकरण प्रकल्पही बंद पडले आहेत. काही गावातील सौरउर्जेवरील पाणी योजना नादुरूस्त आहेत.