शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

जिल्ह्यातील ८८ हातपंप बंद

By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत.

उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट : सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील हातपंप नादुरूस्तगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत. यापैकी सद्य:स्थितीत तब्बल ८८ हातपंप बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हातपंप दुरूस्तीच्या कामात पंचायत समितीस्तरावरून दिरंगाई होत असल्याचा आरोप गावातील नागरिकांकडून केला जात आहे.मुलचेरा तालुक्यासह एकुण १२ तालुक्यात ग्रामपंचायती अंतर्गत एकूण ९ हजार १ हातपंप आहेत. यापैकी ७ हजार ३७२ हातपंपाच्या देखभाल व दुरूस्ती संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी करारनामे केले आहेत. करारनामे करण्यात आलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील ९१८, आरमोरी ६१८, कुरखेडा ७५३, धानोरा ८०१, चामोर्शी ८८४, अहेरी ७९१, एटापल्ली ७०८, सिरोंचा ६५६, कोरची ५१४, देसाईगंज ३३१ व भामरागड तालुक्यातील ३९८ हातपंपाचा समावेश आहे. सद्य:स्थितीत बंद असलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, आरमोरी ४, कुरखेडा ३, धानोरा ८, चामोर्शी ८, अहेरी ४, सिरोंचा १५, कोरची १, भामरागड ४ व एटापल्ली तालुक्यातील सर्वाधिक ३१ हातपंपाचा समावेश आहे.सदर ८८ हातपंप बंद असल्याने संबंधित गावातील व परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील महिन्यात जिल्हाभरातील एकूण ४३७ हातपंप बंद पडले होते. त्यापैकी ३४९ हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली. अद्यापही ८८ हातपंप बंद आहेत. पंचायत समिती प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव व हातपंप देखभाल दुरूस्तीच्या वाहनाची संख्या कमी आहे. धानोरा तालुक्यात हातपंप दुरूस्तीसाठी पंचायत समितीकडे एकच वाहन उपलब्ध आहे. परिणामी तालुक्याच्या परिसर व गावातील संख्येचा आवाका लक्षात घेता तालुक्यात लवकर वाहन पोहोचत नाही. (नगर प्रतिनिधी)खंडित वीज पुरवठ्याने अनेक नळ पाणी योजना बंदग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने तालुका मुख्यालय व मोठ्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र काही गावातील पाणी योजनेचे लाखो रूपयांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरणने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून २५ वर नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याच्या काही गावातील जलशुध्दीकरण प्रकल्पही बंद पडले आहेत. काही गावातील सौरउर्जेवरील पाणी योजना नादुरूस्त आहेत.