शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

८६ गावांमध्ये होणार नागरिक सुविधा केंद्र

By admin | Updated: June 12, 2014 00:02 IST

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. अशा ८६ गावामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार

गडचिरोली : जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. अशा ८६ गावामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याने नागरिकांचा शारीरिक व मानसिक श्रम वाचण्यास मदत होऊन पैशाचीही बचत होणार आहे. देशातल्या संपूर्ण ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू झाले आहेत. एवढेच नाही तर शासनाकडून मिळणारे अनुदानही सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात भविष्यात जमा केले जाणार आहे. हे सर्व काम संग्राम केंद्राच्या मदतीने सुरू आहे. या संग्राम केंद्राला बहुविध सुविधा देणारे केंद्र बनविण्यासाठी सरकारची धडपड आहे. जिल्ह्यातील ८६ संग्राम केंद्रामध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. या केंद्रामध्ये नागरिक सुविधा केंद्र सुरू करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. संग्रामचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल इंगुलकर व जिल्हा समन्वयक शंभू गेडाम यांच्या उपस्थितीत तालुका समन्वयकांची बुधवारी सभा झाली. या सभेत ८६ संग्राम केंद्रामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या सुविधा केंद्रामध्ये मोबाईल रिचार्ज, टी. व्ही. रिचार्ज, रेल्वे आरक्षण, बस आरक्षण, पॅन कार्ड बनविणे, पासपोर्ट तयार करणे, विद्युत बील भरणे, ई - लर्निग , विमानाचे रिझर्व्हेशन करणे यासारख्या अत्यंत महत्वाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराचा रस्ता धरावा लागत होता. १० रूपयाच्या कामासाठी ५० रूपयाचे तिकिट व २०० रूपये रोजी बुडवावी लागत होती. या सर्व सुविधा आता गावातच मिळणार असल्याने नागरिकांचा श्रम वाचण्यास मदत होणार आहे. संग्राम केंद्राच्या माध्यमातून आवश्यक सुविधा मिळणार असल्याने नागरिकांचे शहरात होणारे स्थलांतरणारही थांबण्यास मदत होणार आहे. या सर्व सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सॉफ्टवेअर संग्राम केंद्रातील संगणकामध्ये टाकण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व सोयीसुविधा अत्यंत कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे सर्व काम अत्यंत गतीने होण्यासाठी जिल्हा समन्वयक शंभू गेडाम, तालुका समन्वयक व संग्राम केंद्रातील संगणक परिचालक अहोरात्र मेहनत घेत आहेत. (नगर प्रतिनिधी)