शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
2
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
3
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
5
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
6
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
7
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
8
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
9
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
10
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
11
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
13
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
16
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
17
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
18
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
19
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
20
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?

८६ गावांमध्ये होणार नागरिक सुविधा केंद्र

By admin | Updated: June 12, 2014 00:02 IST

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. अशा ८६ गावामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार

गडचिरोली : जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. अशा ८६ गावामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याने नागरिकांचा शारीरिक व मानसिक श्रम वाचण्यास मदत होऊन पैशाचीही बचत होणार आहे. देशातल्या संपूर्ण ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू झाले आहेत. एवढेच नाही तर शासनाकडून मिळणारे अनुदानही सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात भविष्यात जमा केले जाणार आहे. हे सर्व काम संग्राम केंद्राच्या मदतीने सुरू आहे. या संग्राम केंद्राला बहुविध सुविधा देणारे केंद्र बनविण्यासाठी सरकारची धडपड आहे. जिल्ह्यातील ८६ संग्राम केंद्रामध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. या केंद्रामध्ये नागरिक सुविधा केंद्र सुरू करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. संग्रामचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल इंगुलकर व जिल्हा समन्वयक शंभू गेडाम यांच्या उपस्थितीत तालुका समन्वयकांची बुधवारी सभा झाली. या सभेत ८६ संग्राम केंद्रामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या सुविधा केंद्रामध्ये मोबाईल रिचार्ज, टी. व्ही. रिचार्ज, रेल्वे आरक्षण, बस आरक्षण, पॅन कार्ड बनविणे, पासपोर्ट तयार करणे, विद्युत बील भरणे, ई - लर्निग , विमानाचे रिझर्व्हेशन करणे यासारख्या अत्यंत महत्वाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराचा रस्ता धरावा लागत होता. १० रूपयाच्या कामासाठी ५० रूपयाचे तिकिट व २०० रूपये रोजी बुडवावी लागत होती. या सर्व सुविधा आता गावातच मिळणार असल्याने नागरिकांचा श्रम वाचण्यास मदत होणार आहे. संग्राम केंद्राच्या माध्यमातून आवश्यक सुविधा मिळणार असल्याने नागरिकांचे शहरात होणारे स्थलांतरणारही थांबण्यास मदत होणार आहे. या सर्व सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सॉफ्टवेअर संग्राम केंद्रातील संगणकामध्ये टाकण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व सोयीसुविधा अत्यंत कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे सर्व काम अत्यंत गतीने होण्यासाठी जिल्हा समन्वयक शंभू गेडाम, तालुका समन्वयक व संग्राम केंद्रातील संगणक परिचालक अहोरात्र मेहनत घेत आहेत. (नगर प्रतिनिधी)