शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

८२० वीज खांब बदलणार

By admin | Updated: July 22, 2016 01:14 IST

मोडकळीस व जीर्ण झालेले जिल्हाभरातील सुमारे ८२० वीज खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले असून त्यापैकी आजपर्यंत १४३ खांब बदलविण्यात आले आहेत.

गडचिरोली : मोडकळीस व जीर्ण झालेले जिल्हाभरातील सुमारे ८२० वीज खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले असून त्यापैकी आजपर्यंत १४३ खांब बदलविण्यात आले आहेत. इतर खांब बदलविण्याची तयारी सुरू आहे. वीज खांब बदलविल्याने होणारा धोका काही प्रमाणात टळला असला तरी अजूनही हजारो खांब जीर्ण अवस्थेत ग्रामीण भागात दिसून येतात. सदर खांब बदलविण्याची तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागाला चंद्रपूर जिल्ह्यातून वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा करण्याचे एकमेव माध्यम खांब व वीज तारा आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ग्रामीण भाग २० ते ३० वर्षांपूर्वी विद्युतने जोडण्यात आला आहे. काळाच्या ओघात लोखंडी खांब जमिनीजवळ गंजले आहेत. तर सिमेंट खांबांचीही कार्यक्षमता कमी झाल्याने तेही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातून असे धोकादायक खांब बदलविण्याच्या हजारो तक्रारी वीज विभागाकडे प्राप्त होतात. वीज विभागाने अतिशय धोकादायक असलेले जिल्हाभरातील सुमारे ८२० खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले आहे. यामध्ये उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनीवरील खांबांचा समावेश आहे. गडचिरोली डिव्हीजनमध्ये येणाऱ्या गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, कोरची या सहा तालुक्यातील सुमारे १४३ खांब बदलविण्यात आले आहेत. तर आलापल्ली विभागाअंतर्गत येणाऱ्या चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या सहा तालुक्यातील केवळ दोनच खांब बदलविले असून ६६५ खांब बदलविणे शिल्लक आहेत. बहुतांश गावांमध्ये ३० ते ४० वर्षांपूर्वी वीज आली आहे. ३० ते ४० वर्षांत लोखंडी वीज खांब गंजून खालून त्याला ठिकठिकाणी छिद्र पडतात. त्यामुळे ते केव्हाही कोसळण्याची शक्यता राहते. परिणामी सदर खांब बदलविणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या मार्फतीने तसेच सामान्य नागरिकही तालुकास्तरावरील वीज कंपनीच्या कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करतात. तक्रारीची दखल घेऊन वीज खांब बदलविल्यास वीज कंपनीला १० हजारपेक्षा अधिक खांबांची गरज भासेल. मात्र वीज खांब उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत वीज विभाग सदर खांब बदलविण्यास टाळाटाळ करते. परिणामी आजही ग्रामीण भागात अशा प्रकारचे हजारो धोकादायक खांब दिसून येतात. सदर खांब बदलविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी वीज विभागने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी) जंगल भागातून भूमिगत केबलने वीज पुरवठ्याची मागणी गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के गावे दुर्गम भागात वसली आहेत. या गावांमध्ये वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज विभागाने कितीही नियोजन केले तरी पावसाळ्यादरम्यान एखादे झाड कोसळून वीज पुरवठा खंडित होतो. सदर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यास १५ ते २० दिवस लागतात व तोपर्यंत सदर गाव किंवा परिसर अंधारातच राहतो. यावर एकमेव उपाय म्हणजे अशा गावांना फोनलाईनप्रमाणेच भूमीगत केबल टाकून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंततरी वीज विभागाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे दुर्गम भागातील गावांचा वीज पुरवठा एमएसईबीने कितीने चांगले नियोजन केले तरी खंडित होणारच आहे. ४६३ किमीवरील फाद्यांची छाटणी गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे दरवर्षी वीज तारेजवळ येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. ही गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय गंभीर बाब आहे. झाडांच्या फांद्या न तोडल्यास त्या वीज तारांमध्ये शिरून स्पार्र्किंग होण्याचा धोका राहतो. त्याचबरोबर त्याच वीज तारांचा प्रवाह झाडाच्या बुंद्यापर्यंत आल्यास मानवाला वीज शॉक लागण्याचा धोका आहे किंवा वीज पुरवठा वेळोवेळी स्ट्रिपही होतो. त्यामुळे वीज विभागाच्या मार्फतीने पावसाळ्यापूर्वी दरवर्षी वीज तारेजवळील फांद्या तोडल्या जातात. यावर्षी सुमारे ४६३ किमीवरील फांद्या तोडल्या आहेत. यामध्ये गडचिरोली विभागातील १८३ किमीवरील ३३ केव्ही लाईनच्या जवळील फांद्या तोडल्या आहेत. ११ केव्ही लाईनजवळील २०० किमी अंतरावरील व लघु वाहिनीवरील ४० किमी अंतरावरील फांद्या तोडल्या आहेत. तर आलापल्ली विभागातील ४० किमीवरील फांद्या तोडल्या आहेत. ३७९ इन्सुलेटर बदलविले वीज तारावर असलेला प्रवाह वीज खांबापर्यंत पोहचू न देण्याचे महत्त्वाचे काम पीन इन्सुलेटर करत असते. त्यामुळे पीन इन्सुलेटर सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. वीज विभागाने एकूण ३७९ पीन इन्सुलेटर बदलविले आहेत. यामध्ये गडचिरोली विभागातील ३०४ व आलापल्ली विभागातील ७५ इन्सुलेटरचा समावेश आहे.