शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

८१ गावे विजेने प्रकाशली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:47 IST

गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

ठळक मुद्देवीज विभागाचे कार्य : दुर्गम भागातील गावांमध्ये आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे.गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. यातील बहुतांश गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. काही गावे डोंगरदºयांमध्ये वसली आहेत. या गावांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. काही गावांमध्ये १० ते १५ घरे आहेत. यासर्व अडचणी असल्यामुळे महावितरणने आजपर्यंत २६७ गावांमध्ये वीज पोहोचविली नव्हती. त्यामुळे या गावांमधील नागरिक अंधारातच आपले जीवन कंठत होते. शहर व ग्रामीण भागात विजेच्या दिव्यांचा झगमगाट होत असताना दुर्गम भागातील नागरिक मात्र अंधारात चाचपडत राहत होते.वीज उपलब्ध होणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व गावांना कोणत्याही परिस्थिती वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. सुरुवातीच्या कालावधीत ज्या गावांजवळपास वीज पोहोचली आहे, तेथून वीज नसलेल्या गावांना वीज पुरवठा करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ८१ गावे प्रकाशमान झाली आहेत.महावितरण नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांनी योग्य नियोजन करून आपली यंत्रणा कामाला लावली. वीज विभागाच्या कर्मचाºयांनीही सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत ग्रामीण व दुर्गम भागात विजेची रोहित्र व तत्सम सामुग्री पोहोचविली. दुर्गम भागातील बहुतांश नागरिक बीपीएलधारक असल्याने या नागरिकांना दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील सर्व ग्राहकांना विनामूल्या वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.३१ मार्चपर्यंत उर्वरित गावांना वीज पुरवठा२६७ गावांपैकी ८१ गावांमध्ये वीज पुरवठा झाला आहे. उर्वरित १४१ गावांना ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पुरवठा करण्याचे नियोजन वीज विभागाने केले आहे. जिल्हा नियोजन समितीने १२ कोटी ६८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.विद्युतीकरण करण्यात आलेली गावेमारकेगाव, पुट्टारगोंडी, मागदंडटोला, यजूटोला, किसनेली, मोथाझेलीया, लहानवडगाव, सलाईटोला, मारगिनटोला, हुराटोला, केहकावाही, धुरमुडाटोला, येरांडीटोला, भुसुमकुडो, दाब्बा, रानवाही, शिवगटा , एकराखटोला, कुद्री, कामके, रोपी, झुपी, पेनगंडा, घाटपाडी, कुचेर, वडसाकाल, सिडामटोला, जांभूळगटटा, तारामटोला, कनोली, कानाकोंडा(बु), कोनाकोडां(ख्ुा), कोंडाटोला, येकाबंडाटोला, चारवाही, बंधूर, कहकावाही एस, गडाडपल्ली टोला, कुंडूमटोला, विकासपल्ली, कुसुमपल्ली, भिमनखोजी, दुसागुडा, मालनगट्टा, हजबोडी, रेखामेटा, मर्दकुही, पाउरवेल, तिरणपार, हुरयालदंड, रमेषगुडम, कोलाटोला, वडगाव मोटाटोला, इटामरका, करमे कसनसुर, जवेली, झुरी, केसनिर, जूही टोला, हंटाजूर रिट, येनगाव, हलकनार, मोरचूल, नारकसा, टेकामेटा, मोहूर्ली, कोहका, बैलमागड, पिपली , बुर्गा, हेटलकसा, धोडेपलली, बोटलाचेरू टोला, कर्मे टोला, मेडपल्ली, नवेगाव टोला, रायपूर टोला, इरपनपल्ली, कुरूमवाडा या गावात प्रकाष पोहोचला असून आदिवासी बांधवाप्रति महावितरणचे एक दायित्व पार पडले आहे.