शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

फळझाडांची ७५ हजार रोपे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:20 IST

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसवलतीत वितरण : आंब्याच्या झाडांची मागणी अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी धानाची लागवड फायदेशिर ठरते. मात्र काही शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतात फळझाडांची लागवड केल्यास पडीक असलेली जमीन पिकाखाली येण्यास मदत होते. विशेष म्हणजे यातून शेतकºयाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होते.जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण आंबा, काजू, चिकू, पेरू, आवळा, सीताफळ, फणस, चिंच, कागदी लिंबू, शेवगा, करवंद आदी फळझाडांसाठी योग्य आहे. काही नागरिक आपल्या घरी या झाडांची लागवड करतात. त्याला चांगली फळे येतात. याच झाडांची बागेत लागवड केल्यास शेतकºयाला उत्पन्न मिळण्यास मदत होते. फळशेती ही येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय नवीन बाब आहे. त्यामुळे फळशेतीची रोपटे उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पाच रोपवाटीकांमध्ये फळझाडांची रोपे लावण्यात आली आहेत.सदर रोपे पावसाळ्याच्या कालावधीत अत्यंत सवलतीच्या दरात शेतकºयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सोनापूर येथील रोपवाटीकेत विविध फळझाडांची ८ हजार ९४१, वाकडी येथील रोपवाटीकेत २९ हजार ४५२, कृष्णनगर येथे १७ हजार ६४०, रामगड येथे ११ हजार २१५, कसनसूर येथील रोपवाटीकेत ६ हजार २७५ रोपे उपलब्ध आहेत. पाऊस पडल्यानंतर ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीवर उपलब्ध होणार आहेत.शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी शेतकरी फळझाडांची लागवड करीत नाही. केवळ धानाची शेती केली जाते. पडिक जमिनीवर फळझाडांची लागवड झाल्यास शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास तयार होत नाही. विशेष म्हणजे फळबागेसाठी तारेचे कुंपन असणे आवश्यक आहे. या कुंपनासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. सदर तार अनुदानावर उपलब्ध झाल्यास शेतकरी फळशेतीकडे वळेल.