शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

फळझाडांची ७५ हजार रोपे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:20 IST

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसवलतीत वितरण : आंब्याच्या झाडांची मागणी अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी धानाची लागवड फायदेशिर ठरते. मात्र काही शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतात फळझाडांची लागवड केल्यास पडीक असलेली जमीन पिकाखाली येण्यास मदत होते. विशेष म्हणजे यातून शेतकºयाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होते.जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण आंबा, काजू, चिकू, पेरू, आवळा, सीताफळ, फणस, चिंच, कागदी लिंबू, शेवगा, करवंद आदी फळझाडांसाठी योग्य आहे. काही नागरिक आपल्या घरी या झाडांची लागवड करतात. त्याला चांगली फळे येतात. याच झाडांची बागेत लागवड केल्यास शेतकºयाला उत्पन्न मिळण्यास मदत होते. फळशेती ही येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय नवीन बाब आहे. त्यामुळे फळशेतीची रोपटे उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पाच रोपवाटीकांमध्ये फळझाडांची रोपे लावण्यात आली आहेत.सदर रोपे पावसाळ्याच्या कालावधीत अत्यंत सवलतीच्या दरात शेतकºयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सोनापूर येथील रोपवाटीकेत विविध फळझाडांची ८ हजार ९४१, वाकडी येथील रोपवाटीकेत २९ हजार ४५२, कृष्णनगर येथे १७ हजार ६४०, रामगड येथे ११ हजार २१५, कसनसूर येथील रोपवाटीकेत ६ हजार २७५ रोपे उपलब्ध आहेत. पाऊस पडल्यानंतर ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीवर उपलब्ध होणार आहेत.शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी शेतकरी फळझाडांची लागवड करीत नाही. केवळ धानाची शेती केली जाते. पडिक जमिनीवर फळझाडांची लागवड झाल्यास शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास तयार होत नाही. विशेष म्हणजे फळबागेसाठी तारेचे कुंपन असणे आवश्यक आहे. या कुंपनासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. सदर तार अनुदानावर उपलब्ध झाल्यास शेतकरी फळशेतीकडे वळेल.