शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

फळझाडांची ७५ हजार रोपे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:20 IST

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसवलतीत वितरण : आंब्याच्या झाडांची मागणी अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी धानाची लागवड फायदेशिर ठरते. मात्र काही शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतात फळझाडांची लागवड केल्यास पडीक असलेली जमीन पिकाखाली येण्यास मदत होते. विशेष म्हणजे यातून शेतकºयाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होते.जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण आंबा, काजू, चिकू, पेरू, आवळा, सीताफळ, फणस, चिंच, कागदी लिंबू, शेवगा, करवंद आदी फळझाडांसाठी योग्य आहे. काही नागरिक आपल्या घरी या झाडांची लागवड करतात. त्याला चांगली फळे येतात. याच झाडांची बागेत लागवड केल्यास शेतकºयाला उत्पन्न मिळण्यास मदत होते. फळशेती ही येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय नवीन बाब आहे. त्यामुळे फळशेतीची रोपटे उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पाच रोपवाटीकांमध्ये फळझाडांची रोपे लावण्यात आली आहेत.सदर रोपे पावसाळ्याच्या कालावधीत अत्यंत सवलतीच्या दरात शेतकºयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सोनापूर येथील रोपवाटीकेत विविध फळझाडांची ८ हजार ९४१, वाकडी येथील रोपवाटीकेत २९ हजार ४५२, कृष्णनगर येथे १७ हजार ६४०, रामगड येथे ११ हजार २१५, कसनसूर येथील रोपवाटीकेत ६ हजार २७५ रोपे उपलब्ध आहेत. पाऊस पडल्यानंतर ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीवर उपलब्ध होणार आहेत.शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी शेतकरी फळझाडांची लागवड करीत नाही. केवळ धानाची शेती केली जाते. पडिक जमिनीवर फळझाडांची लागवड झाल्यास शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास तयार होत नाही. विशेष म्हणजे फळबागेसाठी तारेचे कुंपन असणे आवश्यक आहे. या कुंपनासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. सदर तार अनुदानावर उपलब्ध झाल्यास शेतकरी फळशेतीकडे वळेल.