शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

७५ टक्के शेतकरी शेततळ्यांपासून वंचित

By admin | Updated: June 3, 2017 01:06 IST

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याची योजना आणली. पण शेततळे मागणाऱ्या

‘मागेल त्याला शेततळे’ योजना : ४२४८ शेतकऱ्यांचे अर्ज, प्रत्यक्षात ९९३ कामेच पूर्ण मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याची योजना आणली. पण शेततळे मागणाऱ्या २५ टक्केही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे योजनेचे नावच फसवे असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. २०१६ पासून सुरू केलेल्या या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ४२४८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र एकीकडे कुणीही यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा असे दर्शविले जात असताना प्रत्यक्षात केवळ १५०० शेततळ्यांचा लक्ष्यांक जिल्ह्यासाठी ठेवण्यात आला. त्यातही आतापर्यंत ९९३ शेततळ्यांचेच काम पूर्णत्वास गेले आहे. त्या शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. अजून ११४७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. मात्र २१०८ शेतकरी शेततळ्यांच्या लाभासाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह इतर पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून प्रतिलाभार्थी ५० हजार रुपये अनुदानातून शेततळे खोदून दिले जात आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न किंवा प्रवर्गाची कोणतीही अट नाही. केवळ ज्याने आधी अर्ज केला त्याला आधी लाभ या नियमानुसार आतापर्यंत ४२४८ शेतकऱ्यांनी शेततळे खोदण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले. मात्र मुळात लक्ष्यांकच कमी ठेवल्यामुळे या शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळण्यासाठी किती महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल याचे उत्तर कोणाकडे नाही. काही शेतकरी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरही पैशाअभावी शेततळे पूर्ण करू शकलेले नाहीत. खोदलेल्या शेततळ्यातील पाणी जमिनीत न मुरता तळ्यात साचून राहण्यासाठी त्याला अस्तरीकरण करण्याचा पर्यायही आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांनाच करायचा आहे. वास्तविक शासनाने आणखी थोडे पैसे खर्च करून तलावाला अस्तरीकरण करून दिल्यास शेतकऱ्यांना त्या पाण्याचा योग्य उपयोग घेणे शक्य होणार आहे. सर्वाधिक ८६६ अर्ज चामोर्शी तालुक्यातून आले आहेत. मात्र तिथे फक्त १२० शेततळ्यांचा लक्ष्यांक ठेवला आहे. आठ दिवसांत अनुदान देण्याचा उडतोय फज्जा या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्याला शेततळ्याची मंजुरी मिळाल्यानंतर कृषी सहायक प्रत्यक्ष शेतावर जाऊन जागेची मोजणी करतात. त्यात २० बाय २० मीटर आकार आणि ३ मीटर खोल किंवा २५ बाय २५ मीटर आकार आणि ३ मीटर खोल असे दोन पर्याय आहेत. कोणताही पर्याय निवडला तरी अनुदान मात्र ५० हजार रुपयेच मिळतात. ४यात आधी शेततळ्याचे काम पूर्ण करून शेतकऱ्याने तसे पत्र तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यायचे आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून काम व्यवस्थित झाल्याची तपासणी करून नंतर ८ दिवसात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायचे आहे. पण प्रत्यक्षात ८ दिवसात पैसे जमा झाल्याचे उदाहरण क्वचितच पहायला मिळत आहे.