शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

परजिल्ह्यातील ७४ काेराेना रूग्णांनी गडचिराेलीत घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:33 IST

गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग झालेल्या दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्णांना गडचिराेली जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानंतर यापैकी सुमारे ७४ रुग्णांनी गडचिराेली ...

गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग झालेल्या दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्णांना गडचिराेली जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानंतर यापैकी सुमारे ७४ रुग्णांनी गडचिराेली जिल्हा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गडचिराेलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गडचिराेली शहरापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, ब्रह्मपुरी व मूल तालुक्यांतील बहुतांश रूग्ण हे चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी न जाता, गडचिराेली येथेच येतात. काेराेनाच्या साथीत गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रूग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी हाेती व आताही आहे.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासत हाेती. भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध हाेत नसल्याने हे रूग्ण गडचिराेली येथे रेफर केले जात हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचविण्यात आराेग्य यंत्रणेला यश आले नाही व त्यांचा मृत्यू झाला. गडचिराेली जिल्ह्यात वर्षभरात ३२२ काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यातील ७२ रूग्ण हे चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील आहेत तर दाेन रूग्ण दुसऱ्या राज्यातील आहेत. २४८ रूग्ण गडचिराेली जिल्ह्यातील आहेत.

बाॅक्स

गडचिराेलीतच ठेवला देह

काेराेनामुळे मृत्यू झाल्यास संबंधिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. नगर परिषदेचे कर्मचारी आराेग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार गडचिराेली येथे अंत्यविधी करतात. यात केवळ एक ते दाेन जवळच्या नातेवाईकांना अंत्यविधीचे कार्य पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. गावाकडे पार्थीव नेण्याची परवानगी दिली जात नाही. आपला अंत्यविधी गडचिराेलीत हाेईल, असे अनेकांना जिवंत असताना मनातही आले नसेल, मात्र काेराेनाच्या महामारीमुळे त्यांच्या मृतदेहावर गडचिराेलीतच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

बाॅक्स

मृत्यूचे सत्र सुरूच

काेराेनामुळे मृत्यूचे सत्र मागील महिनाभरापासून सुरूच आहे. ४० ते ५० वर्ष वयाेगटातील नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू हाेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संचारबंदी लागू होऊन आता १४ दिवसांचा कालावधी उलटला तरी काेराेनाबाधितांची संख्या कमी न हाेता वाढतच आहे.