शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

वनौषधीच्या उपयोगीतेवर ७० वैदूंचे विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:14 IST

आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली.

ठळक मुद्देदेसाईगंज येथे वैदू संमेलन : आधुनिक युगातही औषधी वनस्पतींचे महत्त्व अबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली.संमेलनाचे उद्घाटन आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज वन विभागाचे उपवनसंरक्षक अ.वि. विवरेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वैदू जयपाल ढवळे, नामदेव कुसराम होते. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यांनी वृध्द कलावंतांच्या धरतीवर वृध्द वैदूंना मानधन देण्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू. सर्व वैदूंनी आरोग्य प्रबोधिनीच्या माध्यमातून निवेदन तयार करावे. शासन दरबारी वैदूंच्या मागण्या मांडू, असे आश्वासन दिले. अध्यक्षीय स्थानावरून बोलताना उपवनसंरक्षक विवरेकर म्हणाले, पारंपारिक वैदूंची भूमिका प्रकृती स्वास्थासाठी फार महत्त्वाची आहे. ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांना डॉक्टरपेक्षाही वैदू जवळचा वाटतो. याचे कारण म्हणजे, वैदू हा सुखदु:खाशी एकरूप असतो. औषधी घेताना आहार, आरोग्य, पथ्य या संबंधी वैदूची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या काळात वैदूंनी नुसतेच जंगलावर निर्भर राहण्यापेक्षा वनौषधींची लागवड आपल्या परिसरात तसेच घरासभोवताल करावी, यातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. नागरिकांनाही उपचार मिळण्यास मदत होईल. वैदूंच्या खुल्या सत्रात वैदूंनी बदलत्या काळात औषधोपचार करताना येणारे अनुभव व आव्हाने यावर मत व्यक्त केले. विष्णू दुनेदार यांनी जैव विविधता संवर्धनात वैदूंच्या योगदानाविषयी माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभने, संचालन व्ही. दुनेदार, तर आभार अर्चना गभने यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरती पुराम, अल्का कुबडे, जितेंद्र सुकारे, वैभव बुराडे, मनिष वझाडे, राधेश्याम मारबते यांनी सहकार्य केले.औषधी वनस्पतींचे संगोपन गरजेचेगडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. या औषधी वनस्पतींचे महत्त्व ग्रामीण व दुर्गम भागातील वैदूंनाच माहित आहे. त्यांच्याकडील ज्ञान पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्रातील संशोधनाचा फार मोठा फटका वैदू व औषधी वनस्पतीला बसला आहे. मेडिकल मध्ये मिळणारी औषधी ही रासायनिक द्रव्यांपासून बनली राहते. या औषधीमुळे रोग जरी लवकर बरा होत असला तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. मात्र वनस्पती औषधीचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. आयुर्वैदामध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींचे संगोपन ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया उपस्थित वैदूंनी व्यक्त केली.

टॅग्स :medicineऔषधं