शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यात ७० टक्के मतदान

By admin | Updated: October 15, 2014 23:16 IST

गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक

तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन पडल्या बंद : दुर्गम भागात अनेक ठिकाणी ३ वाजेपूर्वीच मतदान बंद झाल्याची तक्रारगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात ७० तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी ६८ टक्के मतदान झाले आहे. सरासरी ७० टक्के मतदान झाले.आज मतदानादरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या कोरची तालुक्यातील भीमपूर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड असल्याने १ तास उशीरा मतदान सुरू झाले. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील वायगाव व चंदनखेडी येथे दुपारी १ ते १.३० वाजतादरम्यान ईव्हीएम मशीन बिघाडामुळे बंद झाली. येथे अर्धा ते पाऊन तास मतदान प्रक्रिया खंडीत झाली होती. एटापल्ली तालुक्याच्या अनेक नक्षलप्रभावीत भागात दुपारी १ ते १.३० वाजताच मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती. तर चामोर्शी तालुक्यातील माडे मुधोली व विकासपल्ली या दोन मतदान केंद्रावरही दुपारी १.३० वाजताच मतदान केंद्र बंद केल्याची तक्रार आहे. आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडल्याची माहिती अहेरी पोलिसांनी दिली आहे. ही तुरळक घटना वगळता जिल्हाभर मतदान उत्साह व शांततेत पार पडले. चामोर्शी तालुक्यातील बऱ्याच गावांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. त्यामुळे या भागात मतदानाची टक्केवारी कमी राहिली. आष्टी परिसरातील इल्लूर मतदान केंद्रावर तसेच चामोर्शी शहरातील १९९ व २०० क्रमांकाच्या जि. प. शाळेच्या मतदान केंद्रावर अत्यल्प मतदान झाले. या भागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार केल्यामुळे मतदान कमी झाले. गडचिरोली तालुक्यातील कनेरी मतदान केंद्रावरही बहिष्कारामुळे अत्यल्प मतदान झाले. झालेल्या मतदानातही गडचिरोेली विधानसभा मतदार संघात नोटाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्येही आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये मुलचेरा तालुक्यात ७८.७५, सिरोंचा तालुक्यात ७६.५५, भामरागड तालुक्यात ६२.४३, अहेरी तालुक्यात ६८ तर एटापल्ली तालुक्यात ५५ टक्के मतदान झाले, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात सरासरी ७२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात ६९.५८, कोरची तालुक्यात ७३, देसाईगंज तालुक्यात ७२.२०, कुरखेडा तालुक्यात ६१.७३ टक्के मतदान झाले आहे. दुर्गम भागातून अहेरी विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत २८६ मतदान केंद्रांपैकी २२८ मतदान केंद्राच्या पार्ट्या मुख्यालयात पोहोचलेल्या होत्या, अशी माहिती तेथील प्रतिनिधीने दिली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात वघाळा जुना गावाने मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला. एकाही मतदाराने मतदान केले नाही. महिलांचाही मोठा उत्साह यावेळी मतदानासाठी दिसून आला. मात्र गडचिरोली शहरासह देसाईगंज या नगरपालिका क्षेत्रात मतदानाची टक्केवारी लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी राहिली. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच अनेक मतदारांजवळ प्रशासनाने दिलेल्या स्लिप असल्याचे दिसून आले. नव मतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. लोकसभा निवडणुकीनंतर १६ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील बहुतांश मतदारांनी आज मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. (जिल्हा प्रतिनिधी)