शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

६७३ गावांचा कारभार पोलीस पाटलांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:55 IST

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस प्रशासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाºया पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा अनुशेष गडचिरोली जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. नक्षली दहशत, संवेदनशील भाग व अत्यल्प मानधन या साºया कारणांमुळे जिल्ह्यात पोलीस पाटलांची तब्बल ६७३ पदे सद्य:स्थितीत रिक्त आहेत. परिणामी या ६७३ गावांचा कारभार गेल्या अनेक ...

ठळक मुद्देरिक्त पदांचा अनुशेष कायम : दुर्गम भागात उमेदवार मिळेना

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस प्रशासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाºया पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा अनुशेष गडचिरोली जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. नक्षली दहशत, संवेदनशील भाग व अत्यल्प मानधन या साºया कारणांमुळे जिल्ह्यात पोलीस पाटलांची तब्बल ६७३ पदे सद्य:स्थितीत रिक्त आहेत. परिणामी या ६७३ गावांचा कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस पाटलांविनाच सुरू आहे.जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यापैकी ८४१ पदे भरण्यात आली असून गेल्या अनेक महिन्यांपासून ६७३ पदे रिक्त आहेत.गावातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या कामातही पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. गावात घडलेल्या कुठल्याही गुन्ह्याची तसेच घटनांची माहिती पोलीस प्रशासनाला पोलीस पाटलांमार्फत दिली जाते. पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा शांतता व सुव्यवस्थेबाबत पोलीस पाटलांशी नेहमीच संवाद असतो. याशिवाय अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पाटील पोलीस प्रशासनाला नेहमी मदत करीत असतो. सार्वत्रिक निवडणुकीच्या कामातील सुव्यवस्था सांभाळण्याच्या कामातही पोलीस पाटील योगदान देत असतो. त्यामुळे गावात पोलीस पाटलाचे पद अतिशय महत्त्वपूर्ण आहे.देसाईगंज उपविभागात रिक्त असलेल्या पोलीस पाटलांच्या ३३ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जाहीरनामेही काढण्यात आले आहे. २६ जागांसाठी १४९ जणांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. इतर पाच उपविभागात पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया तुर्तास सुरू करण्यात आली नाही. जिल्ह्यात एटापल्ली उपविभागात भामरागड व एटापल्ली या दोन तालुक्यात सर्वाधिक २४७ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनालाही अडचणी जाणवत आहेत.एका पोलीस पाटलावर अनेक गावांचा भारगडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज व आरमोरी हे चार तालुके शहरी भागालगत आहेत. तर इतर आठ तालुके नक्षलप्रभावित, अतिदुर्गम भागात मोडतात. पोलीस पाटील पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवार मिळणे आवश्यक आहे. मात्र कुरखेडा, अहेरी, एटापल्ली या तीन उपविभागात नक्षली दहशत, अत्यल्प मानधनामुळे या पदासाठी उमेदवार अर्ज भरण्यास तयार होत नाही.प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. मात्र उमेदवार तयार होत नसल्याने पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम राहतो. पोलीस पाटलाला सद्य:स्थितीत केवळ तीन हजार रूपये मानधन महिन्याला मिळते. वर्षानुवर्षे मागणी करूनही शासनाने पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ केली नाही. अनेकांनी स्वत:हून पदही सोडले.आयुक्तांची मंजुरी आवश्यकजिल्ह्याच्या कोणत्याही उपविभागातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित उपविभागाला आयुक्त नागपूर कार्यालयातून मंजुरी घ्यावी लागते. गडचिरोली उपविभागातील रिक्त असलेल्या पोलीस पाटलांच्या १६६ पदांचा रोस्टर मंजुरीचा प्रस्ताव एसडीओ कार्यालयामार्फत आयुक्त नागपूर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर उपविभागातर्फे १६६ रिक्त पदांसाठी पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.