शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात ६३७ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:21 IST

गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

१ हजार १०३ अपघात : गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ६४४ नागरिक जखमीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ६४४ नागरिक जखमी झाले आहेत. आर्थिक विकासाबरोबरच दिवसेंदिवस प्रवासी तसेच माल वाहतुकीच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. मागील पाच वर्षात दुचाकी व चारचाकी या प्रवासी वाहनांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. वाहने वाढली असली तरी त्या प्रमाणात रस्त्यांचे रूंदीकरण झाले नाही. काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले राहतात. रहदारीस सदर मार्ग योग्य नसतानाही त्यावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. परिवहन विभागाने वाहतुकीचे नियम ठरवून दिले असले तरी काही वाहनचालक या नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळेही अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २०११ मध्ये एकूण २२२ अपघात घडले होते. त्यामध्ये १०९ नागरिक मृत्यूमुखी पडले. तर ३५४ नागरिक जखमी झाले. २०१२ मध्ये २७२ अपघातांमध्ये १७४ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २८९ नागरिक जखमी झाले. २०१३ मध्ये २२४ अपघातांमध्ये ११४ नागरिकांचा मृत्यू तर ४०४ नागरिक जखमी झाले. २०१४ मध्ये १९९ अपघात घडले. यामध्ये १२५ नागरिकांचा मृत्यू तर ३३२ नागरिक जखमी झाले. २०१५ मध्ये १८६ अपघातांमध्ये ११५ नागरिक मृत्यूमुखी पडले तर २६५ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत किमान प्राथमिक उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या एका तासाचे महत्त्व लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये या कालावधीला ‘गोल्डन अवर’ असे संबोधल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात भरती करण्यासाठी वाहनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी असले तरी मृतकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)