शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

पाच वर्षात ६३७ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:21 IST

गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

१ हजार १०३ अपघात : गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ६४४ नागरिक जखमीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ६४४ नागरिक जखमी झाले आहेत. आर्थिक विकासाबरोबरच दिवसेंदिवस प्रवासी तसेच माल वाहतुकीच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. मागील पाच वर्षात दुचाकी व चारचाकी या प्रवासी वाहनांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. वाहने वाढली असली तरी त्या प्रमाणात रस्त्यांचे रूंदीकरण झाले नाही. काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले राहतात. रहदारीस सदर मार्ग योग्य नसतानाही त्यावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. परिवहन विभागाने वाहतुकीचे नियम ठरवून दिले असले तरी काही वाहनचालक या नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळेही अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २०११ मध्ये एकूण २२२ अपघात घडले होते. त्यामध्ये १०९ नागरिक मृत्यूमुखी पडले. तर ३५४ नागरिक जखमी झाले. २०१२ मध्ये २७२ अपघातांमध्ये १७४ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २८९ नागरिक जखमी झाले. २०१३ मध्ये २२४ अपघातांमध्ये ११४ नागरिकांचा मृत्यू तर ४०४ नागरिक जखमी झाले. २०१४ मध्ये १९९ अपघात घडले. यामध्ये १२५ नागरिकांचा मृत्यू तर ३३२ नागरिक जखमी झाले. २०१५ मध्ये १८६ अपघातांमध्ये ११५ नागरिक मृत्यूमुखी पडले तर २६५ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत किमान प्राथमिक उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या एका तासाचे महत्त्व लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये या कालावधीला ‘गोल्डन अवर’ असे संबोधल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात भरती करण्यासाठी वाहनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी असले तरी मृतकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)