शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सौभाग्य योजनेतून ६१० घरकूल उजाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:29 IST

प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमोफत वीज पुरवठा : आलापल्ली विभागातील ५०९ तर गडचिरोली विभागातील १०१ घरांना वीज जोडणी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत अंधारात जीवन कंठीत असलेल्या नागरिकांच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पडला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील जवळपास २०० गावे विजेपासून वंचित होती. कोणत्याही परिस्थितीत या गावांना वीज पुरवठा करावा, असे निर्देश राज्य शासनाने दिल्यानंतर वीज वितरण कंपनीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत जवळपास १५० गावांमध्ये वीज पुरवठा केला आहे. वीज पुरवठा झाला असला तरी आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश नागरिक वीज जोडणी घेण्यास तयार नव्हते. अशा नागरिकांना केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी करून दिली जात आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना मोफत वीज जोडणी करून दिली जात आहे. तर इतर लाभार्थ्यांना ५०० रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. ५०० रूपये शुल्क लाभार्थ्यांनी त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरायचे आहे. मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबाची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जात गणनेच्या आधारे करण्यात येणार आहे. योजनेत वीज पुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बील भरणे बंधनकारक आहे. थकबाकीमुळे कायमचा पुरवठा खंडीत झालेले घर किंवा तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरीत होणारी घरे किंवा शेतातील घरे या योजनेस पात्र ठरणार नाही.सौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागातील ५०९, गडचिरोली विभागातील १०१ असे एकूण ६१० कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. वीज जोडणी झालेले बहुतांश लाभार्थी एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी व धानोरा या तालुक्यातील आहेत. सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्टÑात ११ लाख ६४ हजार १३५ लाभार्थ्यांना वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर २१ हजार ५६ लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील घरे तसेच पूर्वी मंजूर झालेल्या पंडीत दिन दयाल ग्रामज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक घुगल, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम व आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनात जास्तीत जास्त गावांना वीज पुरवठा व जास्तीत जास्त नागरिकांना वीज जोडण्या देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने १५० पेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा झाला आहे.दुर्गम भागातील गावांना प्राधान्यसौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागात येणाऱ्या पालेकसा, गटेपल्ली, रूमालकसा, कोकामेटाटोला, उमरगट्टा, कोठागोडा, झुरी, करमटोला, कांडला, सिडामटाला, कोठारी, गुरेटोला, रायपेटा, कोरलामाल, कोरलाचेक, किष्टय्यापल्ली, रमेश गुडम, करजेली, एकराखुर्द, येनकामडा, उमानूर, मारपल्ली, बसवापूर, रायपल्ली, जिमलगट्टा, येरमनार या गावांचा समावेश आहे. तर धानोरा तालुक्यातील बंदूर, धुरमूडटोला, सोनपूर, रानकट्टा, मार्जिनटोला, तारामटोला, मगदंड, सावरगाव, पन्नेमारा, उमरपाल टोला, आरमुरकस, सालईटोला या गावांचा समावेश आहे. ज्या गावात वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशा गावांना सौरऊर्जा संच दिले जात आहे.