शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सौभाग्य योजनेतून ६१० घरकूल उजाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:29 IST

प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमोफत वीज पुरवठा : आलापल्ली विभागातील ५०९ तर गडचिरोली विभागातील १०१ घरांना वीज जोडणी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत अंधारात जीवन कंठीत असलेल्या नागरिकांच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पडला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील जवळपास २०० गावे विजेपासून वंचित होती. कोणत्याही परिस्थितीत या गावांना वीज पुरवठा करावा, असे निर्देश राज्य शासनाने दिल्यानंतर वीज वितरण कंपनीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत जवळपास १५० गावांमध्ये वीज पुरवठा केला आहे. वीज पुरवठा झाला असला तरी आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश नागरिक वीज जोडणी घेण्यास तयार नव्हते. अशा नागरिकांना केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी करून दिली जात आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना मोफत वीज जोडणी करून दिली जात आहे. तर इतर लाभार्थ्यांना ५०० रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. ५०० रूपये शुल्क लाभार्थ्यांनी त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरायचे आहे. मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबाची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जात गणनेच्या आधारे करण्यात येणार आहे. योजनेत वीज पुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बील भरणे बंधनकारक आहे. थकबाकीमुळे कायमचा पुरवठा खंडीत झालेले घर किंवा तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरीत होणारी घरे किंवा शेतातील घरे या योजनेस पात्र ठरणार नाही.सौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागातील ५०९, गडचिरोली विभागातील १०१ असे एकूण ६१० कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. वीज जोडणी झालेले बहुतांश लाभार्थी एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी व धानोरा या तालुक्यातील आहेत. सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्टÑात ११ लाख ६४ हजार १३५ लाभार्थ्यांना वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर २१ हजार ५६ लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील घरे तसेच पूर्वी मंजूर झालेल्या पंडीत दिन दयाल ग्रामज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक घुगल, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम व आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनात जास्तीत जास्त गावांना वीज पुरवठा व जास्तीत जास्त नागरिकांना वीज जोडण्या देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने १५० पेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा झाला आहे.दुर्गम भागातील गावांना प्राधान्यसौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागात येणाऱ्या पालेकसा, गटेपल्ली, रूमालकसा, कोकामेटाटोला, उमरगट्टा, कोठागोडा, झुरी, करमटोला, कांडला, सिडामटाला, कोठारी, गुरेटोला, रायपेटा, कोरलामाल, कोरलाचेक, किष्टय्यापल्ली, रमेश गुडम, करजेली, एकराखुर्द, येनकामडा, उमानूर, मारपल्ली, बसवापूर, रायपल्ली, जिमलगट्टा, येरमनार या गावांचा समावेश आहे. तर धानोरा तालुक्यातील बंदूर, धुरमूडटोला, सोनपूर, रानकट्टा, मार्जिनटोला, तारामटोला, मगदंड, सावरगाव, पन्नेमारा, उमरपाल टोला, आरमुरकस, सालईटोला या गावांचा समावेश आहे. ज्या गावात वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशा गावांना सौरऊर्जा संच दिले जात आहे.