शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

जलयुक्त शिवारची ५८३ कामे अपूर्णच

By admin | Updated: May 30, 2017 00:41 IST

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, ...

३० जूनपर्यंतची मुदत : १५२२ कामांना सुरूवातही नाही!लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, शेतऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध यंत्रणांची ४६११ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र मे महिना संपत आला तरी त्यापैकी केवळ २५०६ कामेच पूर्ण झाली आहेत. ५८३ कामे प्रगतीपथावर आहेत. तर १५२२ कामांना अद्याप सुरूवातही झालेली नाही. त्यामुळे ३० जूनपर्यतच्या मुदतीत ही कामे पूर्ण कशी करणार? हे एक आव्हान ठरले आहे.कृषी विभाग, जिल्हा परिषद (मनरेगा), वन विभाग, जिल्हा परिषद (सिंचन), लघुसिंचन (जलसंधारण) आणि चंद्रपूर पाटबंधारे विभाग (जलसंपदा) आदी विभागांकडे ही ४६११ कामांची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. या अभियानाच्या अंमलबजावणी समितीचे सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी आहे. मात्र त्यांचा कृषी विभागच या कामात सर्वाधिक मागे राहिला आहे. कृषी विभागाने गेल्या वर्षासाठी १६९ गावांमध्ये ३१२८ कामे प्रस्तावित केली होती. मात्र त्यापैकी केवळ १६८२ कामे सुरू केली. त्यातही १३९४ कामेच आतापर्यंत पूर्णत्वास गेली असून २८८ कामे सुरू आहेत. जिल्हा परिषद सिंचन विभागाने १४६ कामे प्रस्तावित असताना १६६ कामांना सुरूवात केली. पण पूर्ण केवळ ७९ कामे केली असून ८७ कामे सुरू आहेत. केवळ वनविभागाने ७१४ प्रस्तावित कामांपैकी ६८५ कामे सुरू करून ती सर्व कामे पूर्ण केली आहेत. चंद्रपूर पाटबंधारे (जलसंपदा) विभागाला केवळ ४ कामे करायची होती. ती चारही कामे त्यांनी सुरू तर केली, मात्र पूर्णत्वास एकही नेले नाही. आतापर्यंत झालेल्या गेल्या आर्थिक वर्षातील कामांवर ३२.८८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे २१६९८ टीएमसी पाणीसाठ्याचा संचय या पावसाळ्यात होणार आहे. प्रगतीपथावरील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत. मात्र यावर्षी लवकर पाऊस येत असल्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने ही कामे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातील की कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखविले जाईल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.नवीन आर्थिक वर्षासाठी ३७९९ कामे प्रस्तावितगेल्या आर्थिक वर्षातील १५२२ कामांना सुरूवात झालेली नसली तरी वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ३७९१ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ८७ कोटी ७० लाख ४ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे. नवीन आर्थिक वर्षातील तीन महिने संपले असताना नियोजित कामांपैकी एकाही कामाला सुरूवात नाही. आता पुढील तीन महिने पावसाळ्याचे राहणार असल्यामुळे या काळात जलयुक्त शिवारची कामे होणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या ६ महिन्यात ३७९१ कामे कशी होणार? हा प्रश्न कायम आहे.जलयुक्त शिवारची कामे सुरूच आहेत. जून अखेरपर्यंत गेल्या आर्थिक वर्षातील कामे पूर्ण होतील. काही कामांच्या वर्क आॅर्डर दिल्या आहेत. मी ४-५ दिवसांपासून सुटीवर असल्यामुळे आताची नेमकी स्थिती माहित नाही.-अनंत पोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सचिव, जलयुक्त शिवार अभियान