शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची ५८३ कामे अपूर्णच

By admin | Updated: May 30, 2017 00:41 IST

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, ...

३० जूनपर्यंतची मुदत : १५२२ कामांना सुरूवातही नाही!लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, शेतऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध यंत्रणांची ४६११ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र मे महिना संपत आला तरी त्यापैकी केवळ २५०६ कामेच पूर्ण झाली आहेत. ५८३ कामे प्रगतीपथावर आहेत. तर १५२२ कामांना अद्याप सुरूवातही झालेली नाही. त्यामुळे ३० जूनपर्यतच्या मुदतीत ही कामे पूर्ण कशी करणार? हे एक आव्हान ठरले आहे.कृषी विभाग, जिल्हा परिषद (मनरेगा), वन विभाग, जिल्हा परिषद (सिंचन), लघुसिंचन (जलसंधारण) आणि चंद्रपूर पाटबंधारे विभाग (जलसंपदा) आदी विभागांकडे ही ४६११ कामांची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. या अभियानाच्या अंमलबजावणी समितीचे सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी आहे. मात्र त्यांचा कृषी विभागच या कामात सर्वाधिक मागे राहिला आहे. कृषी विभागाने गेल्या वर्षासाठी १६९ गावांमध्ये ३१२८ कामे प्रस्तावित केली होती. मात्र त्यापैकी केवळ १६८२ कामे सुरू केली. त्यातही १३९४ कामेच आतापर्यंत पूर्णत्वास गेली असून २८८ कामे सुरू आहेत. जिल्हा परिषद सिंचन विभागाने १४६ कामे प्रस्तावित असताना १६६ कामांना सुरूवात केली. पण पूर्ण केवळ ७९ कामे केली असून ८७ कामे सुरू आहेत. केवळ वनविभागाने ७१४ प्रस्तावित कामांपैकी ६८५ कामे सुरू करून ती सर्व कामे पूर्ण केली आहेत. चंद्रपूर पाटबंधारे (जलसंपदा) विभागाला केवळ ४ कामे करायची होती. ती चारही कामे त्यांनी सुरू तर केली, मात्र पूर्णत्वास एकही नेले नाही. आतापर्यंत झालेल्या गेल्या आर्थिक वर्षातील कामांवर ३२.८८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे २१६९८ टीएमसी पाणीसाठ्याचा संचय या पावसाळ्यात होणार आहे. प्रगतीपथावरील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत. मात्र यावर्षी लवकर पाऊस येत असल्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने ही कामे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातील की कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखविले जाईल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.नवीन आर्थिक वर्षासाठी ३७९९ कामे प्रस्तावितगेल्या आर्थिक वर्षातील १५२२ कामांना सुरूवात झालेली नसली तरी वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ३७९१ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ८७ कोटी ७० लाख ४ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे. नवीन आर्थिक वर्षातील तीन महिने संपले असताना नियोजित कामांपैकी एकाही कामाला सुरूवात नाही. आता पुढील तीन महिने पावसाळ्याचे राहणार असल्यामुळे या काळात जलयुक्त शिवारची कामे होणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या ६ महिन्यात ३७९१ कामे कशी होणार? हा प्रश्न कायम आहे.जलयुक्त शिवारची कामे सुरूच आहेत. जून अखेरपर्यंत गेल्या आर्थिक वर्षातील कामे पूर्ण होतील. काही कामांच्या वर्क आॅर्डर दिल्या आहेत. मी ४-५ दिवसांपासून सुटीवर असल्यामुळे आताची नेमकी स्थिती माहित नाही.-अनंत पोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सचिव, जलयुक्त शिवार अभियान