शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

५७ हजार नागरिकांना मिळाले विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 01:26 IST

केंद्रात आलेल्या भाजपा सरकारने पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना सुरू केले आहेत.

जनजागृतीचा परिणाम : १४८ नागरिकांना अटल पेन्शनचा लाभगडचिरोली : केंद्रात आलेल्या भाजपा सरकारने पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना सुरू केले आहेत. या दोन्ही योजनांबाबत जनतेत केंद्र, राज्य व बँक प्रशासनाच्या मार्फतीने व्यापक प्रमाणात जागृती करण्यात आली. त्यामुळे या दोन विमा योजनांचा लाभ ५७ हजार २११ नागरिकांनी घेतला आहे. यामध्ये ३५ हजार ८४३ नागरिकांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व २१ हजार ३६८ नागरिकांनी पंतप्रधान जीवन ज्योती योजनेचा लाभ घेतला आहे.

३५ हजार ८४३ नागरिकांचा पंतप्रधान सुरक्षा विमा
४पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रिमियम केवळ १२ रूपये आहे. या योजनेंतर्गत १८ ते ७० वयाच्या नागरिकांचा विमा काढता येतो. विमा काढल्यानंतर सदर व्यक्तीचे अपघातात जखमी झाल्यास त्याला एक लाख रूपयांची मदत दिली जाते. जर त्याचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयाला दोन लाख रूपये दिले जातात. अत्यंत कमी खर्चात या योजनेचा लाभ मिळत असल्याने सर्वाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्हाभरातील विविध राष्ट्रीयकृत, सहकारी बँकेत सुमारे ३५ हजार ८४३ नागरिकांनी या योजनेंतर्गत स्वत:चा विमा काढून घेतला आहे. सर्वाधिक विमे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेमध्ये काढण्यात आले आहेत. बँक आॅफ इंडियाने ४ हजार ९४४ विमा काढला आहे.

२१ हजार नागरिकांना जीवन ज्योती योजनेचे संरक्षण
४या योजनेंतर्गत वार्षिक हप्ता ३३० रूपये भरावा लागतो. या योजनेचा लाभ १८ ते ५० मधील नागरिकांना घेता येते. मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांंची भरपाई दिली जाणार आहे. बँकेचे खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे असा राहणार आहे. विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित विमाधारकाचा अर्ज ३१ मे पर्यंत बँकेकडे येणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २१ हजार ३६८ नागरिकांनी विमा काढला आहे. सर्वाधिक विमा स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ४ हजार ३७९ नागरिकांनी काढले आहेत. बँक आॅफ इंडियामध्ये ३ हजार ५२६, बँक आॅफ महाराष्ट्रामध्ये ४ हजार ३३४, सहकारी बँकेने ३ हजार ९८४ नागरिकांचा विमा काढला आहे.

अटल पेन्शनला अत्यल्प प्रतिसाद
४माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत ४२ रूपयांपासून २१० रूपयांपर्यंतची दरमहा गुंतवणूक करता येते. वयाच्या ६० वर्षानंतर संबंधित व्यक्तीला किमान १ हजार ते ५०० हजार रूपयांपर्यंत वार्षिक पेन्शन दिल्या जाते. या योजनेंतर्गत वयानुसार रक्कम भरायची आहे. जेवढी जास्त रक्कम भरली जाईल, तेवढी पेन्शन जास्त मिळणार आहे. या योजनेचा लाभ जिल्हाभरातील १४८ नागरिकांना मिळणार आहे. सर्वाधिक पेन्शनचे नामांकन बँक आॅफ इंडियामधून करण्यात आले आहे. या बँकेतून १०४ नामांकन भरण्यात आले आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये सहा, बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये २२, आयडीबीआय बँकेत १५ व कॅनरा बँकेत एका नागरिकाने नामांकन भरले आहे. इतर योजनांच्या तुलनेत या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.