शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

जिल्हा बँकेकडे ५४ कोटी जमा

By admin | Updated: November 19, 2016 01:51 IST

नोट बंदीच्या निर्णयानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जुन्या ५०० व १०००

५५ शाखांमध्ये काम : १००० व ५०० च्या जुन्या नोटा स्वीकारल्याने चार दिवसांतील रक्कमगडचिरोली : नोट बंदीच्या निर्णयानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जुन्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे अधिकार दिले होते. या चार दिवसांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ५३ कोटी ५६ लाख २ हजार ५०० रूपयांची रोकड जमा झाली आहे. ज्या बँकांना रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची परवानगी आहे. अशा सर्वच बँकांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नागरिकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरूवात केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात विशेष करून ग्रामीण भागात एकूण ५५ शाखा कार्यरत आहेत व या बँकेशी चार लाख ग्राहक जुळलेले आहेत. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद झाल्याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचताच ग्रामीण भागातील नागरिकांनीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये गर्दी करून नोटा जमा करण्यास सुरूवात केली. १० ते १३ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांच्या माध्यमातून ५३ कोटी ५६ लाख २ हजार ५०० रूपयांचे जुने नोट स्वीकारण्यात आले. त्यानंतर मात्र १४ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांमध्ये ५०० व १००० ची नोट स्वीकारण्यास मनाई केली. तेव्हापासून बँकेच्या शाखांनी नोटा स्वीकारणे बंद केले. केवळ चार दिवसात ५४ कोटी रूपये जमा झाले आहेत. पैसे स्वीकारण्याची परवानगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कायम राहिली असती कर हा आकडा शेकडो कोटी रूपयांच्या वर गेला असता. जिल्हा बँकेला पैसे स्वीकारण्यास बंदी घातल्याने ग्रामीण नागरिकांची अडचण वाढली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राप्त झालेल्या जुन्या नोटांपैकी ७५ टक्के रक्कम रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे जमा करण्यात आली आहे. केवळ २५ टक्के रक्कम बँकेकडे शिल्लक आहे. सदर रक्कम सुध्दा रिझर्व्ह बँकेकडे येत्या काही दिवसात जमा केली जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. आता जिल्हा सहकारी बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने दुर्गम व अतिदुर्गम भागातील ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन खाते उघडून नोटा जमा कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)नोटा बदलविण्यासाठी तालुकस्तरावर धावजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रामुख्याने ग्रामीण भागात शाखा आहेत. ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, विद्यार्थी, शेतकरी यांचे बँक खाते प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आहेत. मात्र केंद्र शासनाने या बँकांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची फार मोठी गोची झाली आहे. पैसे बदलविण्यासाठी तालुकास्तरावरील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेमध्ये नागरिकांना धाव घ्यावी लागत आहे. याही शाखेत केवळ दोन हजार रूपयेच बदलवून दिले जात असल्याने उर्वरित रकमेचे काय करावे, असा गहण प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.