शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

५१७ गावे मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 00:57 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या १७ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित क्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतींना मिळाला.

तेंदूपत्ता संकलन व व्यवस्थापन : ४८ कोटी ४ लाखांचे मिळाले उत्पन्नदिलीप दहेलकर गडचिरोलीराज्याच्या ग्रामविकास विभागाच्या १७ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित क्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतींना मिळाला. तसेच या संदर्भात राज्यपालांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ५१७ गावाच्या ग्रामसभांनी यंदा तेंदूसंकलन, विक्री व व्यवस्थापनाचे कार्य योग्यरीत्या पार पाडले. या माध्यमातून ५१७ गावांना एकूण ४८ कोटी ४ लाख ४ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींच्या हित व कल्याणाच्या दृष्टीने राज्यपालांनी २०१४ रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र वन उत्पादन अधिनियम १९९७ मध्ये सुधारणा केली. यात बांबू व तेंदूसह गौण वनोपजाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील गौण वनोपजाची मालकी ग्रामसभा व ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे. ३० आॅक्टोबर २०१४ च्या अधिसूचनेअन्वये भारतीय वन अधिनियम १९२७ मध्ये सुधारणा करून गौण वन उत्पादनासाठी वाहतूक परवाना देण्याचे अधिकार ग्रामसभांना प्रदान करण्यात आले आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी ग्रामसभांना पर्यायी एक व पर्यायी दोन देण्यात आले. पर्यायी दोन अन्वये ग्रामसभा आवश्यकतेनुसार संबंधित विभागाचे तांत्रिक सहाय्य घेऊन तेंदूची विल्हेवाट लावू शकतात. या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील ५१७ गावांनी ग्रामसभा घेऊन तेंदू संकलन विक्री व व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली जिल्ह्यात तेंदूचे संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी नऊ तालुक्यातील एकूण १३० ग्रामपंचायतींनी पर्याय दोनची निवड केली. यामध्ये एकूण ५७३ गावांचा समावेश आहे. ५६ गावांची माहिती अप्राप्तगडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या तेंदू हंगामात पेसा क्षेत्रातील एकूण १३० ग्रामपंचायतीमधील ५७३ गावांनी पर्यायी दोनची निवड करून तेंदू संकलन विक्री व व्यवस्थापनाचे कार्य केले. यापैकी ५१७ गावांनी ग्रामसभा घेऊन लिलाव प्रक्रिया पार पाडली. उर्वरित ५६ गावांनी ग्रामसभा घेऊन तेंदू संकलन व व्यवस्थापन केले. मात्र या ग्रामसभांना लिलाव प्रक्रियेतून नेमके किती उत्पन्न प्राप्त झाले. या संदर्भाची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला अद्यापही प्राप्त झाली नाही. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील १६, भामरागड तालुक्यातील ११ व धानोरा तालुक्यातील २९ गावांचा समावेश आहे.