शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच्या कामांचे ५०३ प्रस्ताव पडले धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:47 IST

जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत.

ठळक मुद्दे९.२२ कोटींचा निधी परतीच्या मार्गावर : पाच महिन्यानंतरही दखल नाही

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत. मात्र साडेपाच महिने लोटले तरी त्यापैकी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी न दिल्यास दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे पडून असलेला ९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी ३१ मार्चनंतर पुन्हा शासनाकडे परत जाणार आहे.ग्रामपंचायतींना विशेष अनुदान योजनेअंतर्गत स्मशानभूमीतील गैरसोयी दूर करण्यासाठी २०१० पासून विशेष निधी दिला जातो. त्यानुसार २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेला ९.२२ कोटींचा निधी मिळाला होता. परंतू त्यावर्षी या योजनेचे प्रस्तावच मंजुरीसाठी गेले नाही. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ अशा दोन वर्षातील ५०३ प्रस्तावांची यादी गेल्या २९ सप्टेंबर २०१७ ला जिल्हा नियोजन समितीकडे पाठविली. मात्र आता साडेपाच महिने लोटून चालू आर्थिक वर्षही संपत आले तरीही त्या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही.जिल्हा परिषदेने मंजुरीसाठी पाठविलेल्या ५०३ प्रस्तावांची एकूण किंमत ४१ कोटी १६ लाख ५० हजार रुपये आहे. सध्या जि.प.कडे ९ कोटी २२ लाख उपलब्ध असून २०१७-१८ मधील नियतव्यय मंजूर असलेले ३ कोटी रुपये शासनाकडून मिळायचे आहे. अशा एकूण १२ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावांची निवड करून त्यांना जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. ज्या गावांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळेल त्या गावच्या ग्रामपंचायतींकडे तो निधी लगेच वळता केला जाईल.बैठकीत चर्चाच नाही?विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. पण त्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चाच झाली नाही. त्यासाठी कोणाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे याचा पालकमंत्र्यांना शोध घ्यावा लागणार आहे. आता नवीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढाकार घेऊन मंजुरीसाठी प्रस्तावांची तातडीने निवड केल्यास आणि पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंजुरी दिल्यास ही कामे मार्गी लागून पावसाळ्यापूर्वी स्मशानभूमींमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात.चामोर्शी व सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्तावजिल्हाभरातून आलेल्या ५०३ गावांमधील प्रस्तावांमध्ये सर्वाधिक ७७ प्रस्ताव चामोर्शी तालुक्यातील आहेत. सिरोंचा तालुक्यातील ७४, कुरखेडा तालुक्यातील ६१, अहेरी तालुक्यातील ५१, धानोरा तालुक्यातील ५०, कोरची तालुक्यातील ३७, आरमोरी तालुक्यातील ३२, एटापल्ली तालुक्यातील ३२, गडचिरोली तालुक्यातील २५, मुलचेरा तालुक्यातील २६, देसाईगंज २० तर सर्वात कमी भामरागड तालुक्यातील १८ प्रस्तावांचा समावेश आहे.ग्रामपंचायतींकडून प्रत्येकी ५ ते १० लाखांची कामेशासनाच्या निकषानुसार स्मशानभूमीतील कामांसाठी आलेल्या प्रस्तावांमध्ये ५ ते १० लाखांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने शेडचे बांधकाम, सिमेंट रस्ता, मोरी, चबुतऱ्याचे बांधकाम, बोअरवेल खोदणे, जलशुद्धीकरण (आर.ओ.मशिन) यंत्र बसविणे आदी कामांचा समावेश आहे.