शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

स्मशानभूमीच्या कामांचे ५०३ प्रस्ताव पडले धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:47 IST

जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत.

ठळक मुद्दे९.२२ कोटींचा निधी परतीच्या मार्गावर : पाच महिन्यानंतरही दखल नाही

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत. मात्र साडेपाच महिने लोटले तरी त्यापैकी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी न दिल्यास दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे पडून असलेला ९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी ३१ मार्चनंतर पुन्हा शासनाकडे परत जाणार आहे.ग्रामपंचायतींना विशेष अनुदान योजनेअंतर्गत स्मशानभूमीतील गैरसोयी दूर करण्यासाठी २०१० पासून विशेष निधी दिला जातो. त्यानुसार २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेला ९.२२ कोटींचा निधी मिळाला होता. परंतू त्यावर्षी या योजनेचे प्रस्तावच मंजुरीसाठी गेले नाही. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ अशा दोन वर्षातील ५०३ प्रस्तावांची यादी गेल्या २९ सप्टेंबर २०१७ ला जिल्हा नियोजन समितीकडे पाठविली. मात्र आता साडेपाच महिने लोटून चालू आर्थिक वर्षही संपत आले तरीही त्या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही.जिल्हा परिषदेने मंजुरीसाठी पाठविलेल्या ५०३ प्रस्तावांची एकूण किंमत ४१ कोटी १६ लाख ५० हजार रुपये आहे. सध्या जि.प.कडे ९ कोटी २२ लाख उपलब्ध असून २०१७-१८ मधील नियतव्यय मंजूर असलेले ३ कोटी रुपये शासनाकडून मिळायचे आहे. अशा एकूण १२ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावांची निवड करून त्यांना जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. ज्या गावांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळेल त्या गावच्या ग्रामपंचायतींकडे तो निधी लगेच वळता केला जाईल.बैठकीत चर्चाच नाही?विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. पण त्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चाच झाली नाही. त्यासाठी कोणाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे याचा पालकमंत्र्यांना शोध घ्यावा लागणार आहे. आता नवीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढाकार घेऊन मंजुरीसाठी प्रस्तावांची तातडीने निवड केल्यास आणि पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंजुरी दिल्यास ही कामे मार्गी लागून पावसाळ्यापूर्वी स्मशानभूमींमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात.चामोर्शी व सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्तावजिल्हाभरातून आलेल्या ५०३ गावांमधील प्रस्तावांमध्ये सर्वाधिक ७७ प्रस्ताव चामोर्शी तालुक्यातील आहेत. सिरोंचा तालुक्यातील ७४, कुरखेडा तालुक्यातील ६१, अहेरी तालुक्यातील ५१, धानोरा तालुक्यातील ५०, कोरची तालुक्यातील ३७, आरमोरी तालुक्यातील ३२, एटापल्ली तालुक्यातील ३२, गडचिरोली तालुक्यातील २५, मुलचेरा तालुक्यातील २६, देसाईगंज २० तर सर्वात कमी भामरागड तालुक्यातील १८ प्रस्तावांचा समावेश आहे.ग्रामपंचायतींकडून प्रत्येकी ५ ते १० लाखांची कामेशासनाच्या निकषानुसार स्मशानभूमीतील कामांसाठी आलेल्या प्रस्तावांमध्ये ५ ते १० लाखांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने शेडचे बांधकाम, सिमेंट रस्ता, मोरी, चबुतऱ्याचे बांधकाम, बोअरवेल खोदणे, जलशुद्धीकरण (आर.ओ.मशिन) यंत्र बसविणे आदी कामांचा समावेश आहे.