शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

५०० कोटीतून रस्ते विकास - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: February 9, 2016 01:03 IST

गडचिरोली जिल्ह्यात ५०० कोटी रूपये खर्च करून रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात येतील.

चिचडोह बॅरेजला दोन वर्षांत २५० कोटी देणार : २०० तलावांच्या दुरूस्तीसाठी ७० कोटी मिळणारगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ५०० कोटी रूपये खर्च करून रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात येतील. तसेच चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज या सिंचन प्रकल्पाला आगामी दोन वर्षाच्या काळात २५० कोटी रूपये राज्य सरकार उपलब्ध करून देईल. गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ४५० मालगुजारी तलावापैकी २०० तलावांच्या दुरूस्ती कामासाठी ७० कोटी रूपये खर्च येणार असून याचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. नागपूर येथे विभागीय आढावा बैठकीदरम्यान जिल्हा प्रारुप विकास योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा आढावा घेत असताना ते बोलत होते. या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्यासह विभागीय व राज्यस्तरावरील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ मध्ये ११७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले. परंतु त्यांची अतिरिक्त मागणी पाहता, त्यांना १५६ कोटी ९८ लाख रूपये विविध योजनांसाठी देण्यात आले होते. सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात ११९ कोटींची अपेक्षीत तरतूद असून त्यांची अतिरिक्त मागणी पाहता १७५ कोटी रूपये मंजूर करण्यात येतील, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह सिंचन प्रकल्पाला दोन वर्षात २५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून २०० माल गुजारी तलावाची दुरूस्ती ७० कोटी रूपये निधीतून केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांना विहीर, पंप, बैलजोडी, पॉवर टीलर, शेतासाठी कुंपन याकरिता गट तयार करून लाभ द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.फॉरेस्ट इंडस्ट्रीअल पार्क उभारणारजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसामग्री असल्याने गुंतवणुकीसाठी व फॉरेस्ट इंडस्ट्रीअल पार्क उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. वन विभागाच्या जागेत वनौषधी केंद्र उभारण्यासाठी १८ प्रकारच्या वनौषधीचे मार्केटींग व प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणाही या बैठकीत मुनगंटीवार यांनी केली.