शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

५० लाखांतून ५० हातपंप मंजूर

By admin | Updated: July 8, 2016 01:33 IST

तालुक्यात व अहेरी नगर पंचायतीच्या भागात पाणीपुरवठ्याच्या पुरेशा सोयी नसल्याने दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवत होती.

आमदार स्थानिक निधीतून : पाणीटंचाईची समस्या मार्गी लागणारअहेरी : तालुक्यात व अहेरी नगर पंचायतीच्या भागात पाणीपुरवठ्याच्या पुरेशा सोयी नसल्याने दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवत होती. याची दखल घेऊन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या स्थानिक आमदार निधीतून सन २०१५-१६ या वर्षाच्या अखेरीस ५० लाख रूपये किंमतीच्या एकूण ५० हातपंपाचे काम मंजूर केले आहे. या कामांना सुरुवात झाली असल्याने आता अहेरी भागातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लागणार आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी व गडबामणी येथे गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते हातपंप कामाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेलीवार, अहेरी नगर पंचायतीचे सभापती नारायण सिडाम, पप्पू मद्दीवार, संतोष पडालवार, सागर डेकाटे, राजेश तोंबर्लावार, पोशालू चुधरी, सुकुमल हलदर आदी उपस्थित होते.सन २०१५-१६ या वर्षाच्या उन्हाळ्यात तापमानाने कहर केला होता. परिणामी अहेरी भागातील नदी, नाले, विहीर, तलाव, बोड्या आदींसह सर्वच पाणीस्त्रोताची पाण्याची पातळी खालावली होती. याचवेळी दौऱ्यादरम्यान या भागातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या निदर्शनास आला. तसेच यावेळी पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी हातपंप मंजूर करण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिक पालकंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर पालकमंत्री आत्राम यांनी आपल्या आमदार स्थानिक निधीतून प्रत्येकी १ लाख रूपये याप्रमाणे ५० लाख रूपयांतून ५० हातपंप मंजूर केले. हातपंप कामाच्या शुभारंभाप्रसंगी भाजपच्या कार्यकर्त्यांसह गडअहेरी व गडबामणी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नागरिकांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानून हातपंप मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)