शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला

By admin | Updated: June 13, 2015 01:52 IST

तालुक्यातील रेगुंठा नदी घाटातून प्रवाशांची वाहतूक करण्याचा कंत्राट भोई समाजाच्या नागरिकांना न देता इतर समाजातील ठेकेदाराला देण्यात आला आहे.

सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा नदी घाटातून प्रवाशांची वाहतूक करण्याचा कंत्राट भोई समाजाच्या नागरिकांना न देता इतर समाजातील ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे रेगुंठा येथील ५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्यावर स्थलांतराची पाळी आली आहे. सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या मध्ये प्राणहिता नदी आहे. या नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना नदीच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. या प्रवाशांची वाहतूक रेगुंठा येथील भोई समाजाचे कुटुंब (आडेवार नावाडी) करीत आहेत. हा परंपरागत व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या पैशावर या कुटुंबांची उपजीविका सुरू आहे. शासनाच्या धोरणानुसार नदी घाट चालविण्याचा मागील वर्षीपासून लिलाव करण्यात येत होता. गावातील भोई समाजातील नागरिकांची संख्या लक्षात घेऊन याच समाजातील नागरिकांना सरकारी किमतीवर सदर घाट उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीही रेगुंठा घाटाचा लिलाव करण्यात आला. निविदेत दिलेल्या सुचनेप्रमाणे या समाजाचे प्रमुख ५०० रूपये अनामत रक्कम व अर्ज भरून उपस्थित होते. परंतु लिलावातील अधिकाऱ्यांनी वेळेवर लिलाव नियमात बदल करून पाच हजार रूपयांचा भरणा करण्याचे सांगितले. पाच हजार रूपयांची वेळेवर जमवाजमव न झाल्याने सदर लिलाव दुसऱ्या ठेकेदारास देण्यात आला आहे. त्यामुळे येथील ५० कुटुंबांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. रेगुंठा येथील काही भोई कुटुंबावर स्थलांतर करण्याचीही पाळी आली आहे. (तालुका प्रतिनिधी)