शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला

By admin | Updated: June 13, 2015 01:52 IST

तालुक्यातील रेगुंठा नदी घाटातून प्रवाशांची वाहतूक करण्याचा कंत्राट भोई समाजाच्या नागरिकांना न देता इतर समाजातील ठेकेदाराला देण्यात आला आहे.

सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा नदी घाटातून प्रवाशांची वाहतूक करण्याचा कंत्राट भोई समाजाच्या नागरिकांना न देता इतर समाजातील ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे रेगुंठा येथील ५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्यावर स्थलांतराची पाळी आली आहे. सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या मध्ये प्राणहिता नदी आहे. या नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना नदीच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. या प्रवाशांची वाहतूक रेगुंठा येथील भोई समाजाचे कुटुंब (आडेवार नावाडी) करीत आहेत. हा परंपरागत व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या पैशावर या कुटुंबांची उपजीविका सुरू आहे. शासनाच्या धोरणानुसार नदी घाट चालविण्याचा मागील वर्षीपासून लिलाव करण्यात येत होता. गावातील भोई समाजातील नागरिकांची संख्या लक्षात घेऊन याच समाजातील नागरिकांना सरकारी किमतीवर सदर घाट उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीही रेगुंठा घाटाचा लिलाव करण्यात आला. निविदेत दिलेल्या सुचनेप्रमाणे या समाजाचे प्रमुख ५०० रूपये अनामत रक्कम व अर्ज भरून उपस्थित होते. परंतु लिलावातील अधिकाऱ्यांनी वेळेवर लिलाव नियमात बदल करून पाच हजार रूपयांचा भरणा करण्याचे सांगितले. पाच हजार रूपयांची वेळेवर जमवाजमव न झाल्याने सदर लिलाव दुसऱ्या ठेकेदारास देण्यात आला आहे. त्यामुळे येथील ५० कुटुंबांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. रेगुंठा येथील काही भोई कुटुंबावर स्थलांतर करण्याचीही पाळी आली आहे. (तालुका प्रतिनिधी)